शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

रणजी जेतेपदाच्या यशाचे विदर्भाने केले सहर्ष स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 10:55 IST

 विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला.

ठळक मुद्देशहरात आतषबाजी मिठाई वाटून साजरा केला आनंद

आॅनलाईन लोकमतनागपूर : फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने सोमवारी इतिहास घडविताना संघाला रणजी चषक पटकावून दिला. अंतिम लढतीत बलाढ्य दिल्ली संघाविरुद्ध पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवणाऱ्या विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला. आज शंकरनगर, व्हीसीए सिव्हिल लाईन्स परिसर, गोकुळपेठ चौक यासारख्या शहरातील गजबजलेल्या परिसरात चाहत्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला. ‘चॅम्पियन’ एका रात्रीत घडत नसतात. त्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घ्यावी लागते. आज विदर्भ संघाच्या यशाने त्याची प्रचिती आली. विदर्भाने ६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडले.

अविश्वसनीय कामगिरीविदर्भ क्रिकेट संघ कधी रणजी करंडक पटकावेल, हे दिवास्वप्नच होते. मात्र, या संघाने ते स्वप्न पूर्ण करून दाखवीत विदर्भ क्रिकेट संघही ही कामगिरी करून दाखवू शकतो, हे सिद्ध केले आहे. एक माजी खेळाडू म्हणून रणजी करंडक विदर्भ संघाच्या हाती कधी बघायला मिळेल का, याची शक्यताच वाटत नव्हती. मात्र, या तरुण खेळाडूंनी उत्तम सांघिक खेळ करीत ही कामगिरी करून दाखविली. हा क्षण पाहण्यासाठी ६० वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर हा क्षण आल्याने नक्कीच तो मोठा आहे, याचे सर्व श्रेय खेळाडू व सपोर्ट स्टाफला आहे. त्यांनी चांगला खेळ केला. त्यामुळे हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे.-प्रकाश सहस्रबुद्धे, विदर्भ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार

ऐतिहासिक क्षणविदर्भ क्रिकेटच्या प्रत्येक आजी-माजी खेळाडूंचे हे स्वप्न सध्याच्या संघाने पूर्ण करून दाखविले. ज्याप्रकारे संघ यंदाच्या हंगामात खेळला ती खरोखरच ती खेळी अद्वितीय आहे. संघाचे हे विजेतेपद हा प्रत्येकासाठी ऐतिहासिक क्षण आहे. फैज फजलच्या नेतृत्वातील संघाने करून दाखविलेली कामगिरी खरोखर मोठी आहे. यापूर्वी विदर्भ क्रिकेटकडे शुद्र नजरेने बघण्यात येत होते. मात्र, आता संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. विदर्भ संघाच्या कामगिरीची दखल आता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. यात मोठे श्रेय व्हीसीएचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, सध्याचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, अद्वैत मनोहर यांचेही आहे. या सर्वांनी विदर्भ क्रिकेटच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याचेच हे फळ आहे.-प्रवीण हिंगणीकर, माजी रणजीपटूकौतुकास्पद कामगिरीविदर्भ क्रिकेट संघातील नवख्या व अनुभवी खेळाडूंनी यंदाच्या हंगामात रणजी करंडकात जी कामगिरी करून दाखविली ती खरोखरच कौतुकास्पद होती. हा विजय विदर्भातील क्रिकेटपटूंची मानसिकताच बदलविणारी नाही तर त्यांच्याकडे इतर संघांचा जो आतापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन होता तोसुद्धा बदलणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या क्रिकेटपटूंनी वैदर्भीय क्रिकेटप्रेमींना दिलेले हे गिफ्ट आहे. पण, केवळ या विजेतेपदावर समाधान मानून चालणार नाही. आता पुढेही कामगिरीत हेच सातत्य कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी संघावर आली आहे. त्यामुळे आता संघाला नियमितपणे रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे. संघाचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन.-सुहास फडकर, माजी कर्णधार विदर्भ संघजबाबदारी वाढलीरणजी करंडकाचे विजेतेपद, तेसुद्धा इतक्या प्रदीर्घ वर्षांच्या कालावधीनंतर ही खरोखरच एक स्वप्नपूर्ती आहे. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरी, एकदिवसीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी संघाने केली होती. मात्र, रणजी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ही खऱ्या अर्थाने मोठी अचिव्हमेंट आहे. अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. पण, आता या कामगिरीसोबतच जबाबदारीही वाढली आहे. आता संघाला केवळ यावर समाधानी होऊन चालणार नाही तर पुढेही यात सातत्य ठेवावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी अंतिम उपांत्य फेरी, अंतिम फेरी कशी गाठता येईल यासाठी असाच खेळ करावा लागणार आहे तरच संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पण, विदर्भाच्या या कामगिरीची आता प्रत्येकालाच दखल घ्यावी लागणार आहे, हे नक्की.-प्रीतम गंधे, माजी कर्णधार, विदर्भ संघ

खरे चॅम्पियन्सयंदाच्या हंगामात विदर्भ क्रिकेट संघाने जी कामगिरी केली व अंतिम फेरीत दिल्लीविरुद्ध जसा खेळ केला त्यातून विदर्भ संघ हाच विजेतेपदाचा खरा दावेदार होता, हेच दिसून येते. खरोखरच विदर्भ क्रिकेटकरिता हा क्षण अत्यंत मोठा आहे. यंदाच्या हंगामात गुरबानी, वाडकरसारखे खेळाडू पुढे आले आहेत. तर वासीम जाफरसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या खेळाडूच्या मार्गदर्शनामुळे या सर्व टॅलेंटेड खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. कर्णधार फैज फजल, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची भूमिकाही विसरून चालणार नाही. प्रत्येक युवा खेळाडूंवर दाखविलेला विश्वास यामुळे हे शक्य झाले. खऱ्या अर्थाने आपण चॅम्पियन आहोत.-हेमंत वसू, माजी कर्णधार, विदर्भ संघखूप मोठा क्षणक्रिकेटपटू म्हणून विदर्भाकडून खेळताना रणजी करंडकाचे विजेतेपद पटकाविण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अखेर हे स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. संघातील युवा व अनुभवी खेळाडूंनी संपूर्ण हंगामात अनेक मोठ्या संघांना पराभूत करीत ही कामगिरी करून दाखविली. या विजयासाठी तब्बल ६० वर्षे लागली. त्यामुळे हा खूप मोठा क्षण आहे.-अमित देशपांडे, माजी रणजीपटूफैजच्या कामगिरीचा अभिमानविदर्भाच्या जेतेपदात फैजच्या नेतृत्वगुणांचा मोलाचा वाटा राहिला. मी त्याला फार पूर्वी २४ नंबरचा टी-शर्ट घालण्याचा सल्ला दिला होता. फैजमध्ये सकारात्मकवृत्ती असल्यामुळे तो यंदा यशस्वी होईल. विदर्भाला करंकड जिंकून देईल, असे भाकीत आधीच केले होते. मेहनतीला नशिबाची जोड लाभल्याने तो यशस्वी ठरला. रजनीश गुरबानी याच्यात आंतरराष्टय स्तरावर खेळण्याची क्षमता आहे. गोलंदाजीतील भेदकतेच्या बळावर तो लवकरच भारतीय संघात पदार्पण करणार, हे निश्चित. चॅम्पियन विदर्भ संघाचा सार्थ अभिमान वाटतो.- नरेंद्र बुंदे, क्रिकेटचे भाष्यकार आणि ज्योतिषीमनसे अभिनंदन फैज अ‍ॅन्ड कंपनीअखेर दिल्लीला नमवून रणजी करंडक नागपुरात आणल्याबद्दल, कर्णधार फैजसह सर्व सहकारी खेळाडू आणि कोच यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन. ही कामगिरी अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा.- हेमंत गडकरी,विदर्भ प्रमुख मनसे.

टॅग्स :Ranji Trophy 2017रणजी चषक 2017