शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

विवाह मुहूर्त निश्चित, तयारीही झाली होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत व नंतर १४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत व नंतर १४ मार्चपर्यंत बंदी घातली. आता १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन आहे. मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह वा तत्सम ठिकाणी विवाहसोहळा तसेच गर्दी जमेल अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. या कालावधीत विवाहाचा मुहूर्त निश्चित झालेल्यांची मोठी अडचण झाली असून त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

मुहूर्तानुसार अनेकांनी मंगल कार्यालय, लॉन्सची आधीच नोंदणी केली आहे. पत्रिकाही वितरित करण्यात आल्या. भोजन, मंडप वा तत्सम व्यवस्थांसाठी आगाऊ रक्कमही दिली गेली. अकस्मात विवाहसोहळ्यावर बंदी आल्याने लग्नाची तयारी करणारे कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक आर्थिक फटका वधुपित्याला बसण्याची शक्यता आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मर्यादित संख्येत कोरोनाचे नियम पाळून लग्नसोहळ्यांना परवानगी होती. परंतु अनेक लग्नांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने संसर्गाचा धोका वाढला. लग्नसोहळ्यातील गर्दी कोरोना प्रसाराचे केंद्र ठरत असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने मंगल कार्यालये व लॉनमधील समारंभांना निर्बंध घातले. आता २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यात पुन्हा वाढ झाल्यास मोठी अडचण होणार आहे.

...

घरगुती समारंभही धास्तीतच

२१ मार्चनंतर लग्नाच्या तारखा निश्चित करून तयारी करायची की नाही. याबाबतही संभ्रम आहे. आधीच निश्चित असलेले लग्नसमारंभ कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून निवडक लोकांच्या उपस्थितीत करण्याची काही कुटुंबांनी तयारी केली आहे. परंतु लग्नसमारंभ म्हटले की गर्दी होणारच. अशा परिस्थितीत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता असल्याने घरगुती लग्नसमारंभ असलेले कुटुंबीय धास्तीत आहेत.

....

अ‍ॅडव्हान्स मिळणार का?

मंगल कार्यालय नोंदणी, मंडप, भोजन व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांची छपाई यावर मोठी रक्कम खर्ची पडली. पत्रिकांचे वितरणही झाले. ऐन वेळी निर्बंध घातल्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्सधारक वा भोजन व्यावसायिकांकडून नोंदणीसाठी दिलेली रक्कम परत मिळेल की नाही, याची चिंता अनेक कुटुंबांना पडली आहे.

...

बंदी कुठपर्यंत?

प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत लग्नसोहळ्यांवर बंदी राहणार आहे. यामुळे संबंधितांना कुटुंबातील विवाहसोहळे पुढे ढकलावे लागतील. नव्या तारखा निश्चित करता येणार नाहीत. जेव्हा कधी परवानगी मिळेल तेव्हा मंगल कार्यालयात नोंदणी मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कुटुंबात एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह होणार आहे, त्यांना नेमके काय करावे हे सुचेनासे झाले आहे.