शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१० दिवसात इम्पेरिकल डेटा गोळा करून न्यायालयात सादर करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 20:05 IST

Nagpur News पुढील १० दिवसांत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर हा डाटा न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ठळक मुद्देनिवडणुका कोर्टाच्या आदेशाने होतील

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आडनावावरून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू होते. आता त्यात सुधारणा केल्या जाणार असून, आडनाव घेताना जात व प्रवर्गाचीही संबंधित ग्रामपंचायतीकडून तपासणी केली जाईल. पुढील १० दिवसांत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर हा डाटा न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले ते काही अंशी खरे आहेत. राज्य सरकारला याची कल्पना होती. आडनावावरून सॅम्पल सर्व्हे केला तर त्यातून ओबीसीचे नुकसान होऊ शकते. त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. राज्यात २० लाख कर्मचारी आहेत, त्यांच्या मदतीने डाटा गोळा होत आहे. ओबीसींचे कोणतेही नुकसान सहन केले जाणार नाही व होऊ दिले जाणार नाही. अधिसूचना निघाली असली तरी निवडणुका कोर्टाच्या आदेशाने होईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत मदतीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार

- संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येतील. काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी ९ मतांची गरज आहे. सर्व मिळून लढलो तर ते शक्य होईल. याबाबत शिवसेनेसोबत चर्चा केली जाईल. विधान परिषद निवडणुकीत सर्व अपक्ष महाविकास आघाडीसोबत राहतील, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

पहिल्या पसंतीची १६२ मते, सरकार स्थिर

- राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मते मिळाली. त्यामुळे सरकार स्थिर आहे हे दिसून येते. या निवडणुकीत आमचे नियोजन चुकले. विधान परिषद निवडणुकीत आम्ही ताकपण फुंकून पिऊ, असेही ते म्हणाले. चावाचावीचे राजकारण करण्यापेक्षा हस्तांदोलनाचे राजकारण करून महाराष्ट्राला प्रगतिपथावर न्यावे लागेल. स्थिर सरकार असेल तर विकासाला गती मिळते, सरकारला अस्थिर करत असेल तर महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसेल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार