शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:42 IST

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपरकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश ढवळून निघत असताना कोरोनापासून आपला बचाव करणे व अर्थव्यवस्था मजबूत करणे ही दोन्ही कामे एकत्रितपणे करण्यास प्राधान्य असले पाहिजे. सद्यस्थितीत देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू,तांदूळ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मौलिक वाटा असतो. त्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. सोबतच औद्योगिक पातळीवर चीनमधून बाहेर पडणाºया कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा सुरू होणार आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढा देत असताना लोकांमधील नैराश्य जाऊन आत्मविश्वास कायम राहावा यासाठी वृत्तपत्रांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.नागपुरात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होऊ शकतातनागपूर जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये सुधारणा करता येतील. संपूर्ण शहर बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रभाव शहरातील ज्या भागात अधिक आहे, तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतात. असे करत असताना सुरक्षा व नियमांचे पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. लवकरच पूर्ण स्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी