शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:42 IST

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपरकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश ढवळून निघत असताना कोरोनापासून आपला बचाव करणे व अर्थव्यवस्था मजबूत करणे ही दोन्ही कामे एकत्रितपणे करण्यास प्राधान्य असले पाहिजे. सद्यस्थितीत देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू,तांदूळ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मौलिक वाटा असतो. त्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. सोबतच औद्योगिक पातळीवर चीनमधून बाहेर पडणाºया कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा सुरू होणार आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढा देत असताना लोकांमधील नैराश्य जाऊन आत्मविश्वास कायम राहावा यासाठी वृत्तपत्रांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.नागपुरात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होऊ शकतातनागपूर जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये सुधारणा करता येतील. संपूर्ण शहर बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रभाव शहरातील ज्या भागात अधिक आहे, तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतात. असे करत असताना सुरक्षा व नियमांचे पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. लवकरच पूर्ण स्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी