शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

बहिष्कृतांची वर्गीय बांधणी करावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:06 IST

हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : यशवंत महोत्सवात ‘दलित पँथरचा उत्तरार्ध’वर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्रातर्फे आयोजित यशवंत महोत्सवात मंगळवारी ‘दलित पँथरचा उत्तरार्ध’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी वक्ता म्हणून डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, नगरसेविका वंदना भगत, प्रा. रश्मी सोवनी उपस्थित होते. व्यासपीठावर गिरीश गांधी, समीर सराफ उपस्थित होते. डॉ. मनोहर म्हणाले, एक शासन आर्थिक कोंडी करते तर दुसरे शासन धार्मिक सरंजामशाही लादत आहे. वर्तमानात धार्मिक दडपशाहीतून विशिष्ट जाती, धर्म व वर्गाला वेगळे पाडण्याचे कारस्थान होते आहे. या दोन्ही मूलतत्त्वात हजारो वर्षांपासून सामान्य माणूस नागवला गेला आहे. बाबासाहेबांची राजकीय मर्मदृष्टी या नागवलेल्या माणसाला न्याय देण्याची होती. त्यांच्यासमोर कुणी परका नव्हता. शोषित,बहिष्कृ त समाज त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. मात्र यांनी जाती-पोटजातीच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे केले. तुम्ही संविधान मानत असल्याने जाती-धर्माचे राजकारण जुळविणे तुम्हाला शक्य नाही. त्यामुळे विशिष्ट धर्माचे, विचारांचे तत्त्वज्ञान बाजूला ठेवून देशातील सर्वहारा समुदाय व समाजाला एकत्रित करावे लागेल, तेव्हाच माणूस, समाज आणि मानवी मूल्य टिकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.विचार व्यक्त करताना डॉ. प्रकाश खरात यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाचा उद्देश घेऊन निर्माण झालेल्या दलित पँथरमुळे त्यावेळी शोषणकर्त्यांमध्ये व राज्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती व त्यांच्या कार्याची चर्चा जगभर पसरली होती. ही चळवळ आता संथ असली तरी थांबलेली नाही; कारण यात बुद्ध, फुले व डॉ. आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचे अधिष्ठान प्राप्त आहे. जोपर्यंत आर्थिक, सामाजिक शोषण आहे, तोपर्यंत ही चळवळ धगधगत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. प्रदीप आगलावे यांनी, दलित पँथरच्या अधोगतीला राजकारणातील सवर्णांची प्रतिक्रांती जबाबदार असल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेल्या चळवळी या सूज्ञ व शोषणाच्या विरोधात उभ्या झालेल्या चळवळी होत्या. यातून केवळ संघर्षच नाही तर प्रस्थापितांना लाजवेल, असा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा निर्माण केला. सक्षम व्यक्तिविरोधात असक्षम व्यक्ती उभा करून या आदर्श चळवळीला मोडित काढण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यांनी केली. प्रा. रश्मी सोवनी यांनी फाटाफुटीच्या प्रवाहामुळे दलित पँथर अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. असे असले तरी दलित चळवळीने शोषित, वंचितांच्या संघर्षात प्रेरणा निर्माण केली आहे. दलित तरुण परिणामाची पर्वा न करता सूज्ञपणे अन्यायाविरोधात उभा राहण्यास तयार असतो, त्यामुळे अद्याप एक आशा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वंदना भगत यांनी पँथरची चळवळ थांबली नसून पूर्वीसारखा त्याचा दरारा आणि धग कायम असल्याचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन राजेश पाणूरकर यांनी केले. रमेश बोरकुटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणcultureसांस्कृतिक