शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:31 IST

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्दे बेईमानी केल्याने निसर्गानेच घेतला बदला

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या सदस्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाचा क्रम सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील मतभेद मनभेदामध्ये परिवर्तित झाले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे. सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान ते बोलत होते. युतीमध्ये निवडणुका लढविताना आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत यासाठी तासनतास बसून चर्चा करीत राहायचो आणि शिवसेनेचे नेते निघून जायचे. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते, तेव्हा निसर्गच बदला घेत असतो, शिंदे-फडणवीसांचे सरकार हे निसर्गिक सरकार आहे. यानंतर बावनकुळे म्हणाले, सहा महिन्यांत काय झाले, असे प्रश्न विचारले जातात. शेतकऱ्यांशी निगडित सर्वाधिक सकारात्मक निर्णय हे आमच्याच सरकारने घेतले.

महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते फेसबुक लाइव्हच करत राहिले

कोकणासाठी निर्णय घ्यायची वेळ होती तेव्हा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले नाहीत. कोकण उद्ध्वस्त होत असताना माजी मुख्यमंत्री केवळ फेसबुक लाइव्ह करीत राहिले व १८ महिने मंत्रालयात आले नाहीत, आता शिंदे-फडणवीस १८-१८ तास काम करीत आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

बारामतीत एकदाच गेलाे, पवारांना इतके काय लागले ?

अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन