शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:31 IST

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्दे बेईमानी केल्याने निसर्गानेच घेतला बदला

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या सदस्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाचा क्रम सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील मतभेद मनभेदामध्ये परिवर्तित झाले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे. सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान ते बोलत होते. युतीमध्ये निवडणुका लढविताना आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत यासाठी तासनतास बसून चर्चा करीत राहायचो आणि शिवसेनेचे नेते निघून जायचे. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते, तेव्हा निसर्गच बदला घेत असतो, शिंदे-फडणवीसांचे सरकार हे निसर्गिक सरकार आहे. यानंतर बावनकुळे म्हणाले, सहा महिन्यांत काय झाले, असे प्रश्न विचारले जातात. शेतकऱ्यांशी निगडित सर्वाधिक सकारात्मक निर्णय हे आमच्याच सरकारने घेतले.

महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते फेसबुक लाइव्हच करत राहिले

कोकणासाठी निर्णय घ्यायची वेळ होती तेव्हा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले नाहीत. कोकण उद्ध्वस्त होत असताना माजी मुख्यमंत्री केवळ फेसबुक लाइव्ह करीत राहिले व १८ महिने मंत्रालयात आले नाहीत, आता शिंदे-फडणवीस १८-१८ तास काम करीत आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

बारामतीत एकदाच गेलाे, पवारांना इतके काय लागले ?

अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन