शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:31 IST

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्दे बेईमानी केल्याने निसर्गानेच घेतला बदला

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या सदस्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाचा क्रम सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील मतभेद मनभेदामध्ये परिवर्तित झाले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे. सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान ते बोलत होते. युतीमध्ये निवडणुका लढविताना आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत यासाठी तासनतास बसून चर्चा करीत राहायचो आणि शिवसेनेचे नेते निघून जायचे. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते, तेव्हा निसर्गच बदला घेत असतो, शिंदे-फडणवीसांचे सरकार हे निसर्गिक सरकार आहे. यानंतर बावनकुळे म्हणाले, सहा महिन्यांत काय झाले, असे प्रश्न विचारले जातात. शेतकऱ्यांशी निगडित सर्वाधिक सकारात्मक निर्णय हे आमच्याच सरकारने घेतले.

महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते फेसबुक लाइव्हच करत राहिले

कोकणासाठी निर्णय घ्यायची वेळ होती तेव्हा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले नाहीत. कोकण उद्ध्वस्त होत असताना माजी मुख्यमंत्री केवळ फेसबुक लाइव्ह करीत राहिले व १८ महिने मंत्रालयात आले नाहीत, आता शिंदे-फडणवीस १८-१८ तास काम करीत आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

बारामतीत एकदाच गेलाे, पवारांना इतके काय लागले ?

अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन