शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

‘मेट्रोरिजन’साठी वेणाचे पाणी

By admin | Updated: July 5, 2015 02:59 IST

कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची ...

नागपूर : कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची योजना जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे. हे पाणी जीवनी खापा येथील प्रस्तावित उर्ध्व प्रकल्पात सोडण्यात येईल. येथून ते पाईपलाईनव्दारे अमरावती मार्गावरील वेणा जलाशयात आणले जाणार आहे. यासाठी या प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून ८ जुलैच्या स्थायी समितीच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.मनपाला या सर्वेक्षणावर ७४ लाखांचा खर्च करावा लागणार आहे. ६ जून २०१२ च्या स्थायी समितीच्या बैठकीत जीवनी खापा प्रकल्पात नागपूर शहर व मेट्रोरिजनसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पाव्दारे दररोज ७०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु यासाठी वेणा जलाशयाच्या पाणीसाठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी या प्रकल्याची उंची वाढविण्याची गरज आहे. हा प्रस्ताव तयार करताना प्र्रकल्पाचा सर्वे करण्याची गरज आहे. प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाला मनपाची मंजुरी घेतल्यानंतर सिंचन व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभागातर्फे हा खर्च केला जाणार आहे.वेणा प्रकल्पातील जलसंचय वाढल्याने बुडित क्षेत्रात वाढ होणार आहे. बुडित क्षेत्राच्या सर्वेसाठी ९ लाख, खड्डे व छिद्र, माती परीक्षण यावर ४० लाख, मध्यप्रदेशची सीमा ते वेणा प्रकल्पापर्यत पाणी आणण्यासाठीच्या सर्वेवर १८ लाख तसेच इतर कामावर ७ लाखाचा खर्च होण्याचा अंदाज आहे. सर्वे नंतर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.(प्रतिनिधी)अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणारशहरातील दहनघाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाचा मोफत पुरवठा करून मनपाने आदर्श निर्माण केला होता. यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळत होता. परंतु आता दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजवे लागणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना ५०० रुपये भरावे लागतील. परंतु यासाठी त्यांना नगरसेवकाचे पत्र आणावे लागेल. इतरांना अंतिम संस्कारासाठी निविदा दरानुसार लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. डिझेल, गॅसचा वापर केल्यास २०० रुपये द्यावे लागणार आहे. जुन्या कंत्राटदाराचा करार संपला असल्याने पुढील दोन वर्षासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहनघाटावर वर्षाला ५४०० टन लाकडाची गरज भासते. यावर ३.०५ कोटी खर्च होतो. एका अंतिम संस्कारासाठी ३०० किलो लाकूड व १० किलो गोवऱ्या लागतात. दहनघाटाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.