शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

‘त्या’ पुस्तकाविरोधात गुरुभक्तांमध्ये संतापाची लाट

By admin | Updated: August 24, 2016 03:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित

भावना दुखावणाऱ्या पुस्तकावर बंदीची मागणी : नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित पुस्तकामुळे समस्त गुरुदेव भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पंढरपूरचे ह.भ.प. महाराज वक्ते यांनी लिहिलेल्या ‘संत तुकाराम महाराज-सदेह वैकुंठागमन’ या पुस्तकावर संपूर्ण बंदी लावण्याची मागणी गुरुदेवभक्तांनी केली आहे. यासाठी श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूरतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन सादर करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्याला कशाचीही तोड नाही. राष्ट्रसंतांनी रचलेल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्राच्या विकासाचे स्रोत सांगितले आहेत. धार्मिकतेचे अवडंबर करण्यापेक्षा मानव समाजाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जनतेला सांगितला आहे. घराघरामध्ये ग्रामगीता एक आदर्श ग्रंथ म्हणून वाचली जाते. राष्ट्रसंतांच्या विचारांना मानणारा पुरोगामी विचारांचा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या महापुरुषाच्या महान ग्रंथाबाबत अत्यंत विकृतपणे ‘...सदेह वैकुंठगमन’ या पुस्तकात वर्णन केले आहे. एखादा विकृत माणूसच अशा प्रकारचे वर्णन करू शकतो, अशी टीका श्री गुरुदेव सेवाश्रमाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली. महाराज वक्तेच्या पुस्तकामध्ये राष्ट्रसंताबाबतही खोटे आरोप केले गेले आहेत. लेखकाने भारतीय संविधानाचा सुद्धा अर्वाच्च भाषेत अपमान केला आहे. वास्तविक राष्ट्रसंतांनी कधीही धार्मिक अवडंबराला थारा दिला नाही. त्यांची शिकवण समानतेची होती. कदाचित हीच बाब धर्मांधाना खटकत असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. राष्ट्रसंतांना मानणाऱ्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, दोन संप्रदायांमध्ये भांडणे लावणे आणि राष्ट्रसंतांचे विचार समाजामधून हद्दपार करण्याचे धर्मांधाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. विकृत मनोवृत्तीच्या लेखकाने धर्मांधतेची गरळ ओकल्याची टीका त्यांनी केली.मंगळवारी असंख्य गुरुभक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वक्तेंच्या पुस्तकावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुभक्तांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे यावेळी आश्वासन दिले. या प्रतिनिधी मंडळामध्ये अ‍ॅड. अशोक यावले, रुपराव वाघ, प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी, अ‍ॅड. कृ पाल भोयर, रवी मानव, खडतकर, मोहनदास चोरे, बालू शिंदे, सचिन काळे, अंकित राऊत, गोपाळराव सिंगूरकर, देवीदास लाखे, डॉ. गोपाल हजारे, सुभाष बांगडे, दशरथ कोठे, भाऊराव तायवाडे, सुशीला लाडसे, ज्योती निचड, बाबाराव पाटील, गंगाध्रा घोडमारे, मयूर पाटणे, राकेश गिरी, नितीन सूर्यवंशी, नीळकंठ कळंबे आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)