शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हजार कोटींच्या कुलर व्यवसायावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST

नागपूर : राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या ...

नागपूर : राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. पण आता दुकाने बंद असल्याने कुलरची विक्री कशी करायची, अशी चिंता उत्पादक आणि विक्रेत्यांना सतावत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एक हजार कोटींच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागणार असल्याची भीती उत्पादक आणि विक्रेते व्यक्त करीत आहेत.

नागपूर कुलरसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० पेक्षा जास्त उत्पादक आहेत. या व्यवसायाशी १० हजारांपेक्षा जास्त लोक जुळले आहेत. या व्यवसायात अप्रत्यक्षपणे इलेक्ट्रिशियन, वूडवूल विक्रेते, नवीन व जुने मोटर पंप विक्री करणारे, पाण्याची टाकी विक्रेते, देखभाल करणारे आदी जुळले आहेत. पण आता कुलर उत्पादक व विक्रीची दुकाने बंद असल्याने सध्या सर्वच बेरोजगार झाले आहेत.

नागपुरातून नागपूर जिल्हा, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाना या राज्यात कुलर विक्रीसाठी जातात. लॉकडाऊनमुळे मालाची जावक बंद झाली आहे. उत्पादकांकडे हजारो संख्येत कुलर पडून आहेत. त्यात गेल्यावर्षीच्या कुलरची भर पडली आहे.

राम कुलरचे संचालक राजेश अवचट म्हणाले, नागपूर कुलर निर्मिती आणि विक्रीसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० उत्पादकांच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात ६ ते ८ लाख कुलरची विक्री होते. स्थानिकांसह ब्रॅण्डेड कंपन्यांच्या कुलरची विक्री होते. पण सध्या स्थानिक उत्पादकांनी ब्रॅण्डेड कंपन्यांवर मात केली आहे. सध्या उत्पादन आणि विक्री बंद झाली आहे. ऑनलाईन विक्री केवळ १० ते २० टक्केच आहे. अशीच स्थिती काही दिवस राहिल्यास निर्मितीची साखळी तुटून त्यांच्या आर्थिक संकट येणार आहे. कर्जाची परतफेड करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी उत्पादक व विक्रेत्यांची आहे.

- नागपूर जिल्हात जवळपास ५०० उत्पादक

- एक हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल

- ५ हजारांपेक्षा जास्त विक्रेते

- १० हजार लोकांना रोजगार

एसीची विक्री थांबली

श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले मार्चअखेरपासून मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कंपन्यांच्या एसीची ८० टक्के विक्री होते. हा व्यवसाय कोट्यवधींचा असतो. सध्या सर्व माल पडून आहे. कंपन्यांनी पैसे वसुलीचा तगादा लावला आहे. ते परत कसे करायचे, ही चिंता आहे. बँकेच्या कर्ज, व्याज, कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागेल. आता सर्वच विक्रेत्यांना ऑनलाईन विक्रीचा मार्ग पत्करावा लागणार आहे. सरकारने लॉकडाऊन हटवून इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांना दिलासा द्यावा.