शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पाण्याच्या टाकीला गळती : धोका झाल्यास दोषी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

कामठी : कामठी तालुक्यातील शिरपूर येथील पाण्याच्या टाकीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे ही टाकी कोसळण्यापूर्वी येथे तातडीने नवीन ...

कामठी : कामठी तालुक्यातील शिरपूर येथील पाण्याच्या टाकीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे ही टाकी कोसळण्यापूर्वी येथे तातडीने नवीन टाकीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिरपूर येथे पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. या टाकीची योग्य देखभाल दुरुस्ती न झाल्याने पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे टाकीसभोवताली शेवाळ लागले आहे. सततच्या गळतीमुळे ही टाकी कधीही कोसळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात गॅस्ट्रो रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. आताही प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्याने पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सहा लाख रुपयांचा निधी नवीन टाकी बांधकामाकरिता मंजूर झाला आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे नवीन टाकी बांधकामाला सुरुवात करता आली नाही. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने त्वरित नवीन पाणी टाकीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही समस्या निकालात न निघाल्यास स्थानिक शिवसैनिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवीन टाकीचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने जुन्या पाणी टाकीची साफसफाई व दुरुस्तीचे काम प्रशासनाने तातडीने करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा वाहतूक विभाग उपप्रमुख सचिन वानखेडे, विलास ढेगरे, कवडू वानखेडे, ऋषी रिठे, राजा जुमडे, वामन जुमडे, राकेश ठाकरे व ग्रामस्थांनी केली आहे.