शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार ठरतेय काटोल, नरखेडसाठी वरदान

By admin | Updated: May 18, 2017 02:32 IST

लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे.

लोकसहभागातून वाढली पाण्याची पातळी : शेतकऱ्यांना होतोय फायदा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे. डार्क झोनमध्ये असलेला काटोल-नरखेड तालुका यासाठी राज्यात मॉडेल म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. नरखेड तालुक्यातील सावरगाव, तापनी आणि सीपीखापा येथील जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू असलेल्या काही कामांची बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. सावरगाव येथील लांडगी नदीवर एक जुना कोल्हापुरी बंधारा आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बंधाऱ्याचे दरवाजेही चोरीला गेले होते. शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही लाभ होत नव्हता. जलयुक्त शिवार अंतर्गत या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. यासोबतच नाला खोलीकरणही करण्यात आले आहे. या बंधाऱ्याची लांबी एकूण ९२० मीटर आहे. तर उंची ३.५० मीटर इतकी आहे. चार मीटरपर्यंत नाला खोलीकरण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे जवळपास ३० हेक्टरपर्यंतच्या शेताला लाभ होणार आहे. त्याचप्रकारे सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामामुळे सुद्धा प्रचंड लाभ होत आहे. ओमप्रकाश रेवतकर या शेतकऱ्याच्या शेताजवळ तीन सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नाला खोलीकरणही झाले आहे. यापूर्वी हा नाला केवळ नावालाच होता. ७५० मीटर लांब असलेला या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी जवळपास १५ मीटरने वाढली आहे. परिसरातील शेतामधील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच २७ हेक्टर संरक्षित सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे. कामाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवारअंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात चांगले काम सुरु आहे. मी येथे येण्यापूर्वीपासून चांगली कामे सुरू आहेत. या कामांची गती अशीच सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. या योजनेमुळे येथील भूजल पातळी वाढली असून शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. यातच आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही चांगली योजना आली आहे. यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, काटोल पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित येथील पाणी पुरवठा योजना होती. पाण्याची पातळी खालावल्यामुळे ती जवळपास बंद अवस्थेत होती. परंतु सिमेंट बंधारा झाल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा फायदा पाणीपुरवठा योजनेलाही झाला ही योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे. इतकेच नव्हे तर बंधारा परिसरातील १३ शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी सुद्धा ३ फुटापर्यंत वाढली आहे. - पी.एस. खोब्रागडे, उप अभियंता, लघुसिंचन विभाग तर द्राक्षबागा नष्ट झाल्या असत्या जलयुक्त शिवारअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. हा बंधारा बनल्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींना पाणी आले आहे. उन्हाळ्यातही पाणी राहते. हा बंधारा झाला नसता तर द्राक्षबाग नष्ट झाली असती. - ओमप्रकाश रेवतकर, शेतकरी, सावरगाव