शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

जलयुक्त शिवार ठरतेय काटोल, नरखेडसाठी वरदान

By admin | Updated: May 18, 2017 02:32 IST

लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे.

लोकसहभागातून वाढली पाण्याची पातळी : शेतकऱ्यांना होतोय फायदा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे. डार्क झोनमध्ये असलेला काटोल-नरखेड तालुका यासाठी राज्यात मॉडेल म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. नरखेड तालुक्यातील सावरगाव, तापनी आणि सीपीखापा येथील जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू असलेल्या काही कामांची बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. सावरगाव येथील लांडगी नदीवर एक जुना कोल्हापुरी बंधारा आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बंधाऱ्याचे दरवाजेही चोरीला गेले होते. शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही लाभ होत नव्हता. जलयुक्त शिवार अंतर्गत या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. यासोबतच नाला खोलीकरणही करण्यात आले आहे. या बंधाऱ्याची लांबी एकूण ९२० मीटर आहे. तर उंची ३.५० मीटर इतकी आहे. चार मीटरपर्यंत नाला खोलीकरण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे जवळपास ३० हेक्टरपर्यंतच्या शेताला लाभ होणार आहे. त्याचप्रकारे सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामामुळे सुद्धा प्रचंड लाभ होत आहे. ओमप्रकाश रेवतकर या शेतकऱ्याच्या शेताजवळ तीन सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नाला खोलीकरणही झाले आहे. यापूर्वी हा नाला केवळ नावालाच होता. ७५० मीटर लांब असलेला या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी जवळपास १५ मीटरने वाढली आहे. परिसरातील शेतामधील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच २७ हेक्टर संरक्षित सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे. कामाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवारअंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात चांगले काम सुरु आहे. मी येथे येण्यापूर्वीपासून चांगली कामे सुरू आहेत. या कामांची गती अशीच सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. या योजनेमुळे येथील भूजल पातळी वाढली असून शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. यातच आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही चांगली योजना आली आहे. यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, काटोल पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित येथील पाणी पुरवठा योजना होती. पाण्याची पातळी खालावल्यामुळे ती जवळपास बंद अवस्थेत होती. परंतु सिमेंट बंधारा झाल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा फायदा पाणीपुरवठा योजनेलाही झाला ही योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे. इतकेच नव्हे तर बंधारा परिसरातील १३ शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी सुद्धा ३ फुटापर्यंत वाढली आहे. - पी.एस. खोब्रागडे, उप अभियंता, लघुसिंचन विभाग तर द्राक्षबागा नष्ट झाल्या असत्या जलयुक्त शिवारअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. हा बंधारा बनल्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींना पाणी आले आहे. उन्हाळ्यातही पाणी राहते. हा बंधारा झाला नसता तर द्राक्षबाग नष्ट झाली असती. - ओमप्रकाश रेवतकर, शेतकरी, सावरगाव