शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १२ उद्यानात एसटीपीद्वारे पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

मेहा शर्मा नागपूर : नागनदी व पिवळी नदीच्या काठावर लहान लहान जलशुद्धीकरण केंद्र (सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट-एसटीपी) उभारून १२ उद्यानाला ...

मेहा शर्मा

नागपूर : नागनदी व पिवळी नदीच्या काठावर लहान लहान जलशुद्धीकरण केंद्र (सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट-एसटीपी) उभारून १२ उद्यानाला पाणीपुरवठा करण्याची याेजना कार्यान्वित केली जात आहे. महापाैर दयाशंकर तिवारी यांनी नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन केले. जपानी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात आहे. एकाच वेळी १२ उद्यानात एसटीपीद्वारे पाणी पुरवठा करणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर ठरेल.

दरराेज ५००० लिटर जलशुद्धीकरण करण्याची क्षमता राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे काैस्तुभ चटर्जी यांच्या मते, विकेंद्रीकृत एसटीपी उभारणे ही काळाची गरज आहे. नाग आणि पिवळी नदी काठावर लहान लहान एसटीपी तयार करणे महत्त्वाचे कार्य आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण करून गार्डनिंग व राेडसाईड वृक्षाराेपणासाठी त्याचा वापर हाेईल तसेच उरलेले पाणी नदीपात्रात साेडले जाईल. यामुळे नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत हाेईल. मात्र या नद्यांच्या काठावर अनेक एसटीपी तयार करण्याची गरज आहे, अन्यथा अशुद्ध पाणी पुन्हा नदी पात्रात गेल्याने नदी शुद्धीकरणाचा उद्देश सफल हाेणार नाही, असे मत चटर्जी यांनी व्यक्त केले. असे असले तरी नाग व पिवळी नदीचे शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्यात जमा आहेत. अशावेळी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी हे नैसर्गिक स्रोत शाेधणे आवश्यक ठरेल. यासाठी केंद्राच्या नदी जाेड प्रकल्पांतर्गत नद्यांना जाेडणे पर्याय ठरू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नीरीचे माजी वैज्ञानिक डाॅ. जे. एस. पांडे यांनी प्रकल्पाचे स्वागत केले. झाडे ही जलशुद्धीकरणाची नैसर्गिक एजंट आहेत. ते बाष्पीभवन व श्वसनाचे दाेन्ही काम एकत्रित करतात. जमिनीचे बाष्पीभवन व झाडांचे श्वसन यामुळे जलशुद्धीकरणात मदत हाेते. काेणतीही झाडे मुळांद्वारे जमिनीतील पाणी शाेषून घेतात. बाष्पीश्वसन ही बाष्पीभवन व श्वसनाची एकत्रित प्रक्रिया आहे. सांडपाण्यातील न्यूट्रिएन्ट्स शाेषून त्यांचे विघटन करण्याची क्षमताही झाडांमध्ये असते. मात्र भाजीपाला व फळझाडांची लागवड टाळणे आवश्यक आहे कारण सांडपाण्यातील विषारी तत्व त्यात मिसळून मानवी आराेग्यास धाेका निर्माण हाेण्याची शक्यता असल्याचे डाॅ. पांडे यांनी स्पष्ट केले.