शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

By admin | Updated: June 6, 2017 01:52 IST

औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे

जलतज्ज्ञ राजेंद्र्र सिंग : पर्यावरण दिनानिमित्त तज्ज्ञांचे विचारमंथनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे याकरिता शासनावर अवलंबून न राहता ही लोकचळवळ व्हावी, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र्र सिंग यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने महानिर्मितीच्यावतीने औष्णिक वीज केंद्र्रातील रसायनशास्त्र व शाश्वत पर्यावरण या विषयावर हॉटेल तुली इम्पिरियल येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य महाव्यवस्थापक नितीन वाघ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, श्रीपाल सिंग, दौलत शिवणकर, डॉ. विजय येऊल प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. राजेंद्र्र सिंग म्हणाले की, पावसाच्या पॅटर्नची पिकांच्या पॅटर्नसोबत सांगड घातली तर उत्पादन वाढेल. निसर्गाचे शोषण न करता पोषण केल्यास विकास साधता येईल. राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणल्याचे त्यांनी उदाहरणासह अनेक दाखले दिले. पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा शांत गुणधर्म आहे, पाणी एकमेकांना जोडण्याचे काम करते, त्यामध्ये विनम्रता आहे, त्याचा योग्य सन्मान केला पाहिजे, पाण्याची १० वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.यावेळी महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, महानिर्मितीचे मुख्य अभियंते प्रदीप शिंगाडे,अनंत देवतारे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, सुनील आसमवार, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) रानडे, उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मोहन आव्हाड, शांताराम पौनीकर, अधीक्षक अभियंते डॉ. अनिल काठोये, श्याम राठोड, अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे, संदेश मोरे, सुरेंद्र निशानराव, शशिकांत वेले आदी उपस्थित होते. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर यांनी महानिर्मितीच्या विविध क्षेत्रातील वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. मनीषा बोरीकर यांनी तर दौलत शिवणकर यांनी आभार मानले.कार्यक्षमता वाढ व स्थिरता परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘कार्यक्षमता वाढ व स्थिरता’ या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, ‘सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उद्योगात वापर’ यावर आनंद आभारे , डॉ. साधना रायलू, डॉ. श्रीपाल सिंग, श्रीनिवास नागराजन, डॉ. सीमा श्रीवास्तव, डॉ. टी.डी. कोसे, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.पद्मा राव यांनी अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले.