शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

By admin | Updated: June 6, 2017 01:52 IST

औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे

जलतज्ज्ञ राजेंद्र्र सिंग : पर्यावरण दिनानिमित्त तज्ज्ञांचे विचारमंथनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे याकरिता शासनावर अवलंबून न राहता ही लोकचळवळ व्हावी, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र्र सिंग यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने महानिर्मितीच्यावतीने औष्णिक वीज केंद्र्रातील रसायनशास्त्र व शाश्वत पर्यावरण या विषयावर हॉटेल तुली इम्पिरियल येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य महाव्यवस्थापक नितीन वाघ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, श्रीपाल सिंग, दौलत शिवणकर, डॉ. विजय येऊल प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. राजेंद्र्र सिंग म्हणाले की, पावसाच्या पॅटर्नची पिकांच्या पॅटर्नसोबत सांगड घातली तर उत्पादन वाढेल. निसर्गाचे शोषण न करता पोषण केल्यास विकास साधता येईल. राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणल्याचे त्यांनी उदाहरणासह अनेक दाखले दिले. पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा शांत गुणधर्म आहे, पाणी एकमेकांना जोडण्याचे काम करते, त्यामध्ये विनम्रता आहे, त्याचा योग्य सन्मान केला पाहिजे, पाण्याची १० वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.यावेळी महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, महानिर्मितीचे मुख्य अभियंते प्रदीप शिंगाडे,अनंत देवतारे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, सुनील आसमवार, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) रानडे, उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मोहन आव्हाड, शांताराम पौनीकर, अधीक्षक अभियंते डॉ. अनिल काठोये, श्याम राठोड, अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे, संदेश मोरे, सुरेंद्र निशानराव, शशिकांत वेले आदी उपस्थित होते. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर यांनी महानिर्मितीच्या विविध क्षेत्रातील वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. मनीषा बोरीकर यांनी तर दौलत शिवणकर यांनी आभार मानले.कार्यक्षमता वाढ व स्थिरता परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘कार्यक्षमता वाढ व स्थिरता’ या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, ‘सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उद्योगात वापर’ यावर आनंद आभारे , डॉ. साधना रायलू, डॉ. श्रीपाल सिंग, श्रीनिवास नागराजन, डॉ. सीमा श्रीवास्तव, डॉ. टी.डी. कोसे, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.पद्मा राव यांनी अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले.