शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

पाणीटंचाईची खात्री करावी लागणार

By admin | Updated: May 10, 2014 01:25 IST

टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करताना संबंधित गावात खरेच पाणीटंचाई आहे का याची खातरजमा संबंधित विभागाला करावी लागणार आहे.

 

नागपूर : टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करताना संबंधित गावात खरेच पाणीटंचाई आहे का याची खातरजमा संबंधित विभागाला करावी लागणार आहे. उन्हाळा आला की टंचाईग्रस्त गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनेचा आराखडा प्रशासनाकडून तयार केला जातो. हा आराखडा तयार करताना विशेष परिश्रम करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. गेल्या वर्षीचा आराखडा काढून त्यात स्थानिक पातळीवरच किरकोळ बदल करून तो मंजुरीसाठी पाठविला जातो. त्यामुळे दर वर्षी तीच ती गावे टंचाईग्रस्त आराखड्यात दिसून येतात. दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च करूनही टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होताना दिसत नाही. यंदा पावसाळ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. काही दिवसांचा अपवाद सोडला तर अद्याप ऊनही प्रखरपणे तापले नाही. उलट उन्हाळ्यातही पावसाने हजेरी लावली. भूजलाच्या पातळीत वाढ झाल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल सांगतो. सिंचन प्रकल्पातील जलसाठेही समाधानकारक आहेत. या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या २४५ आहे. विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी व नळ योजना दुरुस्तीसह उपाययोजनांच्या ६६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. एकीकडे पाण्याची उपलब्धता आणि टंचाईग्रस्त गावांसाठी होणारा खर्च लक्षात घेता विषम चित्र पुढे येते. त्यामुळेच टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करताना त्या गावात खरेच पाणी टंचाई आहे का याची खात्री संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना विभाग पातळीवरून प्रशासनाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)