शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरावर पाणीटंचाईचे भीषण सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:48 IST

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी व पेंच प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील जलसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील जलसाठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल,मे महिन्यात शहरातील नागरिकांना पुरेसे प्पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देधरणात २१ टक्के जलसाठा : महापालिके चा १२.८ कोटींचा कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी व पेंच प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील जलसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील जलसाठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल,मे महिन्यात शहरातील नागरिकांना पुरेसे प्पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नागपूर विभागातील जलाशयात जेमतेम २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात ४ फेब्रुवारी रोजी नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाºया नवेगाव खैरी प्रकल्पात ५०.८७ टक्के जलसाठा होता. आज येथे ३९.४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर पेंच धरणातून या जलाशयात पाणी पुरविले जाते. ४ फेब्रुवारी रोजी पेंच धरणात २९.३२ टक्के पाणीसाठा होता. मात्र १४ मार्चला या प्रकल्पात केवळ १५.५१ टक्के पाणीसाठा आहे. केवळ सव्वा महिन्यात या दोन्ही जलसाठ्यातील पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एवढेच नव्हे तर १३ मार्च २०१७ च्या तुलनेतही या दोन्ही धरणात कमी पाणी उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर कन्हान नदीही कोरडी पडण्याच्या स्थितीत आहे. ही सर्व आकडेवारी बघता शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे.संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेणे अपेक्षित होते. मात्र, समित्यांचे सभापती सत्कार समारंभात व्यस्त आहेत. टंचाई निवारणासाठी महापालिकेने १२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणारउन्हाळ्याच्या दिवसात घराघरांत कूलर सुरू होतात. त्यामुळे पाण्याची मागणी वाढते. सध्या शहराला दररोज ६३० एमएलडी पाण्याचा पुरवठा के ला जातो. एप्रिल-मे महिन्यात शहराला ७०० एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात वाढ करावी लागणार आहे. मात्र मर्यादित जलसाठा असल्याने मागणीनुसार पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे.निर्णयाची अंमलबजावणी नाहीसंभाव्य पाणीटंचाईचा विचार करता महापौर नंदा जिचकार यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पेंच धरणातून शहराला होणाºया पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. पाण्याच्या आरक्षणात कपात करू नये, अशी सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना केल्या. तसेच स्थायी समितीच्या बैठकीत टंचाई कृती आराखड्याच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र यावर अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही.शहराचा पाणीपुरवठा सुरळीतसध्या शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. धरणातून अपेक्षित पाणी मिळत आहे. यात                  कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. असे असले तरी संभाव्य टंचाईचा विचार करता १२.८ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. यात शहरातील विहिरींची स्वच्छता, विद्युत पंप बसविणे, नवीन बोअरवेल, हॅन्डपंप दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे.अश्विन मुदगल, आयुक्त महापालिकाधरणात पुरेसा जलसाठानागपूर शहराला १९० द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. आवश्यक असलेला जलसाठा धरणात उपलब्ध आहे. यात कपात करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाही.संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी