शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

१० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:05 IST

कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

ठळक मुद्देपाणी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. एच. स्वामी, महाजेनको कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राम जोशी, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, कार्यकारी अभियंता बॅनर्जी, कळमेश्वरचे मुख्याधिकारी एच. डी. साखरखेडे आदी उपस्थित होते.तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पामध्ये सन २०१७-१८ या वर्षात कमी पावसामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याचे पाणी जास्तीत जास्त उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, सद्यस्थितीत असलेल्या पाणी वापरानुसार २७.५० दलघमी पाण्याची तूट राहणार आहे. त्यामुळे संभाव्य पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.कळमेश्वरला कोच्छी प्रकल्पातून पाणीनवेगांव खैरी प्रकल्पातील पिण्याचे पाणी मातीच्या बांधामुळे काढण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे जलाशयात फ्लोटिंग पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात. कळमेश्वर शहरातील पाणीपुरवठा पेंच उजव्या कालव्यातून करण्यात येत आहे. ३८ किलोमीटर कालव्यातून पाणी येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे बंद नलिकेद्वारे पाणी उचलणे अथवा कोच्छी प्रकल्पातून पाणी उचलण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येऊन येत्या तीन महिन्यात ही योजना कार्यान्वित होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.विद्युत केंद्रांना पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठाऔष्णिक विद्युत केंद्रांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करणे बंधनकारक आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे ४७ दलघमी पाणी वीज निर्मितीकरिता पुरविण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत प्रकल्पासाठी पाण्याचे प्रकल्पीय आरक्षण करताना पुनर्वापर केलेल्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.पाणी काटकसरीने वापराउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करुन शुद्ध पिण्याच्या पाण्याचा इतर कामासाठी कुठेही वापर होणार नाही. यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. उन्हाळ्यात कुलरसह इतर वापरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून इतर कामांकरिता केवळ विहिरीच्या अथवा बोअरच्या पाण्याचा वापर नागरिकांनी करावा यासाठी जनजागृती मोहीम शहराच्या विविध भागात राबवावी. तसेच टिल्लू पंपद्वारे पाणी घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांचे टिल्लू पंप जप्त करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. इतर वापरातील शुद्ध पाण्याची बचत केल्यास १० टक्के पाण्याची बचत होणार आहे.तसेच दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई