शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

पाण्याची गुणवत्ता आता बाह्य यंत्रणेकडून तपासणार; राज्यात १८२ प्रयोगशाळा, ६०० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:03 IST

Nagpur News आता शासन पाण्याची गुणवत्ता तपासणारे तज्ज्ञ आणि शासनाच्या पाणी गुणवत्तेच्या प्रयोगशाळादेखील बाह्य यंत्रणेच्या हातात देत आहे. यामुळे कर्मचारी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने लोकहिताच्या योजना बाह्य यंत्रणेमार्फत राबविण्याचा धडाका लावला आहे. कमिशन बेसिसवर कंपन्यांची नियुक्ती करून स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या संकटात ढकलले जात आहे. आता शासन पाण्याची गुणवत्ता तपासणारे तज्ज्ञ आणि शासनाच्या पाणी गुणवत्तेच्या प्रयोगशाळादेखील बाह्य यंत्रणेच्या हातात देत आहे. यामुळे कर्मचारी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

२०१२-१३ मध्ये सरकारने पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनुजैविक तज्ज्ञ, रासायनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून कंत्राटी स्तरावर पदभरती केली. जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर प्रयोगशाळा स्थापन केल्या. नियुक्त्या करताना बिंदू नामावलीनुसार पदभरती केली. २०१५ मध्ये शासनाने पाणी गुणवत्ता तपासणीच्या प्रयोगशाळा व मनुष्यबळ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे वर्ग केले. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात प्रस्तावही शासनाचा होता; पण अचानक सरकारने ही संपूर्ण यंत्रणा बाह्य यंत्रणेची नियुक्ती करून राबविण्याचा निर्णय घेतला. भविष्यातील धोके लक्षात घेऊन हे मनुष्यबळ आता संघर्षाला पेटले आहे.

साथरोगाला अटकाव

राज्यात १८२ प्रयोगशाळा आहेत व ६०० कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखोंचा महसूल जमा होत आहे आणि साथ रोगाला अटकाव करण्याचे महत्त्वाचे काम या यंत्रणेमार्फत होत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे. पुढचे भविष्य काय असेल, असा प्रश्न आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेण्यास सक्षम नसेल तर २०१३ मध्ये ज्या आरोग्य विभागाने पदस्थापना केली, तिकडे आम्हाला वर्ग करावे.

अतुल पंचभाई, कर्मचारी, पाणी गुणवत्ता व तपासणी तज्ज्ञ

शासनाने आम्हाला कायम करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. समायोजनाच्या बैठकी झाल्यानंतर बाह्य यंत्रणेला वर्ग करण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे. आता लढाई न्यायालयात आहे.

-शहाजी नलावडे, अध्यक्ष, कंत्राटी कर्मचारी संघटना

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण