शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाण्याची गुणवत्ता आता बाह्य यंत्रणेकडून तपासणार; राज्यात १८२ प्रयोगशाळा, ६०० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:03 IST

Nagpur News आता शासन पाण्याची गुणवत्ता तपासणारे तज्ज्ञ आणि शासनाच्या पाणी गुणवत्तेच्या प्रयोगशाळादेखील बाह्य यंत्रणेच्या हातात देत आहे. यामुळे कर्मचारी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने लोकहिताच्या योजना बाह्य यंत्रणेमार्फत राबविण्याचा धडाका लावला आहे. कमिशन बेसिसवर कंपन्यांची नियुक्ती करून स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या संकटात ढकलले जात आहे. आता शासन पाण्याची गुणवत्ता तपासणारे तज्ज्ञ आणि शासनाच्या पाणी गुणवत्तेच्या प्रयोगशाळादेखील बाह्य यंत्रणेच्या हातात देत आहे. यामुळे कर्मचारी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

२०१२-१३ मध्ये सरकारने पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनुजैविक तज्ज्ञ, रासायनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून कंत्राटी स्तरावर पदभरती केली. जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर प्रयोगशाळा स्थापन केल्या. नियुक्त्या करताना बिंदू नामावलीनुसार पदभरती केली. २०१५ मध्ये शासनाने पाणी गुणवत्ता तपासणीच्या प्रयोगशाळा व मनुष्यबळ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे वर्ग केले. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात प्रस्तावही शासनाचा होता; पण अचानक सरकारने ही संपूर्ण यंत्रणा बाह्य यंत्रणेची नियुक्ती करून राबविण्याचा निर्णय घेतला. भविष्यातील धोके लक्षात घेऊन हे मनुष्यबळ आता संघर्षाला पेटले आहे.

साथरोगाला अटकाव

राज्यात १८२ प्रयोगशाळा आहेत व ६०० कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखोंचा महसूल जमा होत आहे आणि साथ रोगाला अटकाव करण्याचे महत्त्वाचे काम या यंत्रणेमार्फत होत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे. पुढचे भविष्य काय असेल, असा प्रश्न आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेण्यास सक्षम नसेल तर २०१३ मध्ये ज्या आरोग्य विभागाने पदस्थापना केली, तिकडे आम्हाला वर्ग करावे.

अतुल पंचभाई, कर्मचारी, पाणी गुणवत्ता व तपासणी तज्ज्ञ

शासनाने आम्हाला कायम करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. समायोजनाच्या बैठकी झाल्यानंतर बाह्य यंत्रणेला वर्ग करण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे. आता लढाई न्यायालयात आहे.

-शहाजी नलावडे, अध्यक्ष, कंत्राटी कर्मचारी संघटना

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण