शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जलस्तर घसरला, चिंता वाढली

By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST

पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील

नागपूरकरांना पाणी मिळेना : गोरेवाड्याची पातळी ३१२.८२ मीटरवरनागपूर : पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील जलस्तर खाली गेला आहे. पातळी ३१२.८२ मीटरवर आली आहे. परिणामी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे काही भागात अर्धा तास तर काही भागात फक्त १५ मिनिट पाणी मिळत आहे. टँकरनेही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. गोरेवाडा येथीन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पातळी ३१४ मीटरवर येणे आवश्यक आहे. पुढील पाच-सहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूने केला आहे. पण वास्तविक सध्याचा जलस्तर व त्यात दररोज होत असलेली नाममात्र वाढ पाहता पुढील दहा दिवस अशीच टंचाई राहण्याची शक्यता आहे. गोरेवाडा तलावातून दररोज ४४० एमएलडी (दशलक्ष घनमीटर) पाण्याची उचल केली जाते. मात्र, महादुला येथूल कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्यामुळे ६० ते ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरले जात नसून बहुमजली इमारतींमध्ये नळाद्वारे पाणी चढेनासे झाले आहे. पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुरात पाणी ेटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना कसेतरी पिण्यापुरते पाणी मिळत आहे. नळाला दहा मिनिट पाणी येते व लगेच नळ बंद होते. टँकर देण्यासाठी नगरसेवकांना फोन केला असता ते पाणी टंचाईचे कारण समोर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता आणि संताप वाढला आहे. (प्रतिनिधी)