शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

२०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या पोटात राक्षस शिरला होता का? खानावळीचा अतिरिक्त खर्च चक्क ४ कोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 12:05 IST

Nagpur News २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत २०१९-२० या वर्षात विद्यार्थ्यांच्या भोजनावर ४ कोटी रुपयांच्या जवळपास अतिरिक्त खर्च झाला आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याणच्या वसतिगृहातील खानावळीला भ्रष्टाचाराची बुरशी?

मंगेश व्यवहारे

नागपूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात २०१९-२० या वर्षात राक्षस शिरला होता का? असा सवाल उपलब्ध खानावळीच्या खर्चाच्या आकडेवारीवरून केला जात आहे. कारण २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत २०१९-२० या वर्षात विद्यार्थ्यांच्या भोजनावर ४ कोटी रुपयांच्या जवळपास अतिरिक्त खर्च झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे २४ वसतिगृह आहेत. २०१८-१९ मध्ये या वसतिगृहात २९९० व २०१९-२० या वर्षातही २९९० विद्यार्थी वास्तव्यास होते; पण २०१८-१९ मध्ये खानावळीचा खर्च ५,९५,४५,६४१ रुपये दाखविला आहे व २०१९-२० मध्ये खानावळीचा खर्च ९,४१,६७,८५४ रुपये दाखविला आहे. या अतिरिक्त खर्चामुळे विभागाकडे बोट दाखविले जात आहे. समाजकल्याणच्या वसतिगृहाच्या खानावळीला भ्रष्टाचाराची बुरशी तर लागली नाही ना? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती विभागानेच माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून दिली आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतिगृह उपलब्ध करून दिली जाते. वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता व दोन वेळच्या भोजनाची सोय केली जाते. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वाहतूक भत्ता व वैद्यकीय सुविधादेखील पुरविल्या जातात. नागपूर जिल्ह्यातील समाजकल्याणच्या २४ वसतिगृहांमध्ये टायगर सावजी कॅटरस (जयताळा) संजय भोजनालय अ‍ॅण्ड लक्ष्मी सब्जी भंडार वर्धा, मे. आनंद एल टेंभुर्णे, (सिद्धार्थ नगर टेका) अनिल पी. अग्रवाल (बाजार लाइन, देवळी, गोंदिया) टायगर काटर्स (जयताळा) निसर्ग महिला बचत गट (नेताजी नगर, भरतवाडा) यांनी २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत विद्यार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले होते. या दोन्ही वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रति विद्यार्थी थाळी दर सारखाच होता. तरीही अतिरिक्त ४ कोटी रुपयांचा खर्च कसा वाढला, ही गोम न समजणारी आहे.

 

- मिळालेल्या माहितीत विद्यार्थ्यांची संख्या सारखी, थाळीचे दरही सारखे असे असताना ४ कोटीच्या जवळपास अतिरिक्त खर्च वाढत असेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार. हा अतिरिक्त खर्च का वाढला, याची चौकशी व्हायला हवी.

-आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच.

टॅग्स :fraudधोकेबाजी