शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 21:02 IST

Nagpur News विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे.

ठळक मुद्देऑगस्टऐवजी जुलैच्या मध्यातच पूर परिस्थितीआठवडाभरात महिन्याच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस संकट रूपाने बरसत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे. धाेकादायक म्हणजे येत्या १७ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने परिस्थिती आणखी वाईट हाेण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते साधारणत: ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावेळी जुलैच्या मध्यातच ही स्थिती निर्माण झाली आहे.

ओडिसाची किनारपट्टी व आसपासच्या परिसरात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे माेठे क्षेत्र निर्माण झाले आहे. शिवाय अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या वातावरणीय स्थितीमुळे मान्सून अत्याधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र ही स्थिती आहे. विदर्भात १३ जुलैपर्यंत सरासरी २९९ मिमी पावसाची नाेंद हाेते; पण यावेळी तब्बल ४०५.४ मिमी पावसाची नाेंद झाली असून ती ३६ टक्के अधिक आहे. विदर्भात संपूर्ण जुलै महिन्यात ३२५ ते ३४० मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मात्र, यावर्षी जुलैच्या मध्यात त्यापेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत अति ते अत्याधिक पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्रीत विदर्भात सर्वत्र जाेरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसा काहीसी गती मंदावली असली तरी सातत्य हाेते व काही भागात अतिवृष्टीचा कहर कायम आहे. नागपुरात २४ तासात ६९.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला. गडचिराेलीत रात्रीच्या ६४.४ मिमीसह २४ तासात ९९.४ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जिल्ह्यात मात्र अतिवृष्टीमुळे काही तालुके पूरग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे गाेंदियात सायंकाळपर्यंत ८ मिमी पावसासह २४ तासात ६०.८ मिमी नाेंद झाली. वर्धा येथे रात्री ८७.४ मिमीसह ८९.४ मिमी नाेंद झाली.

५० वर्षांत पाहिली नाही अशी स्थिती

तज्ज्ञांच्या मते मागील ५० वर्षांत अशी स्थिती पहिल्यांदा अनुभवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे कमी दिवसात अत्याधिक पाऊस हाेत असून, आधीसारख्या अनेक दिवसांच्या झड लागण्याचा प्रकार कमी झाला; पण गेल्या आठ दिवसांच्या झडीने जुन्या दिवसाची आठवण लाेकांना झाली. साधारणत: म्हणजे ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच ही स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :floodपूर