शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 21:02 IST

Nagpur News विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे.

ठळक मुद्देऑगस्टऐवजी जुलैच्या मध्यातच पूर परिस्थितीआठवडाभरात महिन्याच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस संकट रूपाने बरसत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे. धाेकादायक म्हणजे येत्या १७ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने परिस्थिती आणखी वाईट हाेण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते साधारणत: ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावेळी जुलैच्या मध्यातच ही स्थिती निर्माण झाली आहे.

ओडिसाची किनारपट्टी व आसपासच्या परिसरात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे माेठे क्षेत्र निर्माण झाले आहे. शिवाय अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या वातावरणीय स्थितीमुळे मान्सून अत्याधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र ही स्थिती आहे. विदर्भात १३ जुलैपर्यंत सरासरी २९९ मिमी पावसाची नाेंद हाेते; पण यावेळी तब्बल ४०५.४ मिमी पावसाची नाेंद झाली असून ती ३६ टक्के अधिक आहे. विदर्भात संपूर्ण जुलै महिन्यात ३२५ ते ३४० मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मात्र, यावर्षी जुलैच्या मध्यात त्यापेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत अति ते अत्याधिक पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्रीत विदर्भात सर्वत्र जाेरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसा काहीसी गती मंदावली असली तरी सातत्य हाेते व काही भागात अतिवृष्टीचा कहर कायम आहे. नागपुरात २४ तासात ६९.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला. गडचिराेलीत रात्रीच्या ६४.४ मिमीसह २४ तासात ९९.४ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जिल्ह्यात मात्र अतिवृष्टीमुळे काही तालुके पूरग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे गाेंदियात सायंकाळपर्यंत ८ मिमी पावसासह २४ तासात ६०.८ मिमी नाेंद झाली. वर्धा येथे रात्री ८७.४ मिमीसह ८९.४ मिमी नाेंद झाली.

५० वर्षांत पाहिली नाही अशी स्थिती

तज्ज्ञांच्या मते मागील ५० वर्षांत अशी स्थिती पहिल्यांदा अनुभवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे कमी दिवसात अत्याधिक पाऊस हाेत असून, आधीसारख्या अनेक दिवसांच्या झड लागण्याचा प्रकार कमी झाला; पण गेल्या आठ दिवसांच्या झडीने जुन्या दिवसाची आठवण लाेकांना झाली. साधारणत: म्हणजे ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच ही स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :floodपूर