शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

गोदामात सडलेले धान्य रेशन दुकानात

By admin | Updated: September 20, 2015 03:10 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या ...

कमलेश वानखेडे नागपूरसार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या धान्याचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजबबंगलाजवळ असलेले शासकीय गोदाम पूर्णपणे भकास झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाने या गोदामाची देखभाल-दुरुस्ती केलेली नाही. गोदामाचे टिनचे शेड तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून धान्याची पोती भिजत आहेत. परिणामी धान्याचा दुर्गंध येत आहे. अशा धान्याचा रेशन दुकानांमध्ये पुरवठा करून गरिबांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. अजबबंगलाजवळील हे गोदाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येते. अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे गोदामाच्या देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी आहे. तर येथे येणारे धान्य साठवणे, त्याची उचल करून रेशन दुकानदारांना पुरवठा करण्याचे काम नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत एफसीआयकडून पाठविण्यात आलेले गहू, तांदूळ, साखर, डाळ असे सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य या गोदामातील पाचही ब्लॉकमध्ये साठवून ठेवले जाते. येथून नागपूर शहरातील रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. दररोज माल येणे व नेणे सुरू असते. गोदामाची इमारत सुमारे ७० वर्षे जुनी आहे. या गोदामाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाची आहे. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत या गोदामाची गेल्या काही वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे व कित्येक वर्षांपासून गोदामाला साधा चुनादेखील मारलेला नसल्याचे निदर्शनास आले. गोदामाची नियमित साफसफाईदेखील केली जात नाही. गोदामातील भिंतींना मोठमोठे जाळे लागल्याचे पाहायला मिळते. गोदामावर टिनाचे शेड असून काही ठिकाणी त्या टिनाला छिद्र पडले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळते. भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपते. गोदामाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात ओल असल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी गळल्यामुळे गोदामातील धान्य काही प्रमाणात सडले. या धान्याची दुर्गंधी येते. सडका वास येत असलेले हेच दुर्गंधीयुक्त धान्य रेशन दुकानदारांना पुरवठा केले जाते. या सडलेल्या धान्याचा येथे एवढा दुर्गंध येतो की गोदामात पाच मिनिट बसणेही कठीण होते. मात्र, येथे काम करणाऱ्या कामगारांना अशाही परिस्थितीत येथेच बसून जेवणाचा डबा खावा लागतो. गोदामाच्या बाहेर फ्लोरिंग केलेले नाही. त्यामुळे ट्रकमधून पोती काढून गोदामात ठेवताना धान्य खाली पडते, नंतर ते मातीमिश्रित धान्य उचलून पोत्यांमध्ये भरले जाते. पावसाळ्यात तर संपूर्ण चिखल असतो. त्यामुळे चिखलात सांडलेले धान्यही जमा करून नंतर पोत्यांमध्ये भरले जाते. बाहेरच्या व्हरांड्याची स्थिती तर आणखीनच वाईट आहे. गोदामात जागा नसल्यामुळे बाहेर व्हरांड्यातच वजनकाटा लावून धान्याचे वजन केले जाते. वजन सुरू असताना पाऊस आला तर व्हरांड्यात काढलेले सर्वच्यासर्व धान्य भिजते. त्यामुळे ते वाळवून पुन्हा पोत्यात भरून रेशन दुकानदारांकडे पाठविले जाते. येथील कामगारांनी तसेच वखार महामंडळानेही अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना वारंवार पत्र पाठवून गोदामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली; मात्र त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. गोदामात लाईटही नाहीगोदामात धान्याची पोती ठेवण्याचे व काढण्याचे काम सायंकाळी ६ वाजतापर्यंत केले जाते. मात्र एखाद्या वेळी माल घेऊन येणारा ट्रक उशिरा आला तर मात्र धान्याच्या पोत्यांची गोदामात थप्पी लावायला रात्र होते. अजबबंगला परिसरातील या पाचही गोदामात वीजपुरवठा नाही. त्यामुळे सायंकाळ होताच अंधार पसरतो. अशापरिस्थितीत येथे काम करणाऱ्या कामगारांना मेणबत्तीच्या प्रकाशात किंवा टॉर्च लावून तब्बल २० पोत्यांची उंच थप्पी मारावी लागते. कमी प्रकाशामुळे एखाद्या कामगाराचा पाय घसरला तर संपूर्ण पोती त्याच्या अंगावर पडून त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र असे असतानाही गेल्या १० वर्षांत गोदामात एक साधा लाईट लावण्याची तसदीही पुरवठा विभागाने घेतलेली नाही.