शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

गोदाम कर्मचाऱ्यांना हवे कामाचे दाम

By admin | Updated: September 21, 2015 03:22 IST

अजबबंगल्याजवळ असलेल्या सरकारी गोदामाची तर दुरवस्था आहेच,..

१७ वर्षांत पगारवाढ नाही : शौचालयाचीही सुुविधा नाही लोकमत विशेषनागपूर : अजबबंगल्याजवळ असलेल्या सरकारी गोदामाची तर दुरवस्था आहेच, पण या गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामाचे दाम मिळेनासे झाले आहे. गेल्या १७ वर्षांत येथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. विशेष म्हणजे गोदाम परिसरात या कर्मचाऱ्यांना भोजनासाठी स्वतंत्र कक्ष नाही, महिलांसाठी शौचालयाचीही सोय नाही. मूत्रीघर आहे पण त्याचेही दरवाजे तुटले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. अजबबंगला, कॉटन मार्केट व .... या तीन गोदामात एकूण १३५ कर्मचारी काम करतात. १९७५ मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, जिल्हाधिकारी व कर्मचारी युनियनमध्ये करार झाला व कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले. मात्र, १९९८ पासून या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती (पे फिक्सेशन) झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची डीए वाढही बंद करण्यात आली आहे. १९९० पासून येथे कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. फक्त अनुकंपा तत्त्वावर अधूनमधून पदे भरली जातात. तिन्ही सरकारी गोदामांमध्ये एकूण तीन मोकदम हवेत, मात्र फक्त एक आहे. टोळीप्रमुख १२ हवेत, मात्र ८ कार्यरत आहेत.प्रत्येक टोळीत १४ लोडर हवेत, प्रत्यक्षात ८ ते ९ लोडर असून त्यांना अतिरिक्त वेळ देऊन काम करावे लागत आहे. (प्रतिनिधी)गणवेशासाठी वार्षिक १५६ रुपये!राज्य सरकार प्रत्येक बाबीचा ठराविक वर्षांनी आढावा घेते व सुधारित दर लागू करते. या गोदामातील कर्मचाऱ्यांना मात्र गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी एक गणवेश घेण्यासाठी फक्त १५६ रुपये दिले जातात. महागाईच्या काळात १५६ रुपयात एक शर्ट तरी येतो का, यावर पुरवठा विभागानेही कधी विचार केलेला दिसत नाही. कामगारांना दरमहा फक्त ७५ रुपये वैद्यकीय भत्ता दिला जातो. शासनातर्फे होत असलेली ही थट्टा नागपूरचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी थांबवावी, अशी मागणी कामगार- कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिन व गणराज्यदिनाचीही सुटी नाही देशाचा स्वातंत्र्यदिन व गणराज्यदिन साजरा करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. या दिवशी जवळपास सर्वच आस्थापना आपले कर्मचारी व कामगारांना सुटी देतात. मात्र, या शासकीय गोदामात काम करणाऱ्या कर्मचारी- कामगारांना या राष्ट्रीय सणांनाही सुटी दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांना वर्षाला १३ सुट्या दिल्या जातात. कुणी १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला सुटी घेतली तर १३ सुट्यांमधून या सुट्यांची कपात केली जाते. यावर कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. आम्ही संप करीत नाही ही आमची चूक का?कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यावर नाराजी व्यक्त केली. आम्हाला घरसंसार आहे. मुलाबाळांचे शिक्षण करायचे आहे. १७ वर्षांपासून पगारवाढ मिळत नसेल तर हा कुठला न्याय समजायचा. आजवर आम्ही एकदाही संप केलेला नाही. आम्ही एक आठवडा संप पुकारला तरी रेशन दुकानात धान्य पोहोचणार नाही. सरकार झटक्यात जागे होईल. पण आम्ही सामंजस्याने घेतो, संप करीत नाही ही आमची चूक आहे का, असा सवाल गोदाम कर्मचाऱ्यांनी सरकारला केला आहे. शासनाचे लक्ष वेधणार अजबबंगल्याजवळील शासकीय गोदामाची स्थिती पाहून आपल्याला धक्काच बसला. नागपूरकरांना रेशनमार्फत पुरवठा केले जाणारे धान्य एवढ्या वाईट परिस्थितीत ठेवले जाते, हे धक्कादायक आहे. येथील कर्मचाऱ्यांनाही सुविधा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पगारवाढ नाही. शौचालयासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. प्रशासनाचेही या गोदामाच्या एकूणच व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संबंधित प्रश्नावर पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी, वखार महामंडळ व गोदामात काम करणारे कर्मचारी यांची संयुक्त बैठक लावली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल; तसेच विधान परिषदेतही प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले जाईल. - अनिल सोले, विधान परिषद सदस्य ४० वर्षांनंतर केली लोकप्रतिनिधीने पाहणी!आ. अनिल सोले यांनी नुकतीच या गोदामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनाही गोदामाची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोले यांना साकडे घालत गोदामाची दुरुस्ती करण्याची तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. विशेष म्हणजे तब्बल ४० वर्षांनंतर एखादा लोकप्रतिनिधी या गोदामाची पाहणी करण्यासाठी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आले, हे पाहून बरे वाटले, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोले यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. आजवर लोकप्रतिनिधींनी या गोदामाकडे केलेले दुर्लक्ष व आ. अनिल सोले यांनी एका फोनवर घेतलेली दखल यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.