शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

वर्धा ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:37 IST

जागतिक आणि स्थानिक व्यापार बाजारपेठेचे प्रवेशद्वार वर्धा (सिंदी रेल्वे) ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून एक महिन्यात बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्टचे उपाध्यक्ष आणि वर्धा ड्राय पोर्टचे अध्यक्ष (प्रभारी) नीरज बन्सल यांनी दिली.

ठळक मुद्देनीरज बन्सल यांची माहिती : एक महिन्यात निविदा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जागतिक आणि स्थानिक व्यापार बाजारपेठेचे प्रवेशद्वार वर्धा (सिंदी रेल्वे) ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून एक महिन्यात बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्टचे उपाध्यक्ष आणि वर्धा ड्राय पोर्टचे अध्यक्ष (प्रभारी) नीरज बन्सल यांनी दिली.ड्राय पोर्ट पहिल्या १२४ एकरवर खासगी सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी ३५० एकर जागा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. प्रकल्पात सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक व हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे बन्सल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.रेल्वे, रस्ते जोडणी सुलभपहिल्या टप्प्यात ८२ एकर जागेसाठी निविदा काढण्यात येईल. ड्राय पोर्टमध्ये रेल्वे सायडिंगसह रस्ते जोडणी, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, जीएसटी कार्यालय आणि सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी राहणार आहे. या पोर्टमधून माल कंटेनरने जास्तीत जास्त आठ तासांत मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) जाईल, शिवाय भाडेही कमी लागेल. पोर्टवरून कंटेनरने मालाची निर्यात करण्यात येईल. बन्सल म्हणाले, विदर्भातील ९० टक्के कार्गो ‘जेएनपीटी’ला येतात. विदर्भात लॉजिस्टिकची भरपूर क्षमता आहे. ड्राय पोर्टमधून जेएनपीटीपर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्गाने कृषी, स्टील आणि अन्य उत्पादने जातील. बन्सल म्हणाले, महाराष्ट्रात वर्धा, जालना, नाशिक आणि सांगली येथे ड्राय पोर्ट उभारण्यात येणार आहे. जालना आणि वर्धेसाठी डीपीआर तयार आहे आणि जमीन अधिग्रहित केली आहे. नाशिक आणि सांगली येथे अ‍ॅग्रो इंडस्ट्रीमुळे उभारण्यात येणाºया ड्राय पोर्टसाठी राज्य शासनाकडून जमीन मिळालेली नाही.भारतातून १४ दशलक्ष कंटेनरची निर्यातबन्सल म्हणाले, भारतातून दरवर्षी १४ दशलक्ष कंटेनरची निर्यात होते. चीनची आकडेवारी पाहिल्यास एकट्या सांघाई पोर्टवरून ३५ दशलक्ष कंटेरनची निर्यात होते. जगात वाहतूक भाडे ८ ते ९ टक्के आणि भारतात १२ टक्के आहे. किंमत कमी करण्यावर भर आहे. मध्य भारतात कंटेनर विकास ६ ते ७ टक्के आहे. मिहानमध्ये वेगळी सुविधा आहे. वर्धेतील ड्राय पोर्टमुळे तांदूळ निर्यातदार, कापड उद्योग आणि वस्त्र उद्योग, स्टील आणि खनिज व्यापारी, स्क्रॅप, प्लास्टिक आणि पेपर पल्प, इलेक्ट्रिकल यंत्रे, आॅटोमोटिव्ह पार्ट्स उत्पादनांमध्ये वाढ होऊन रोजगार तसेच औद्योगिकीकरण आणि विकासाला चालना मिळेल.

 

 

 

टॅग्स :Travelप्रवास