शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मागेल त्याला रिक्षा परवाना धोरण मागे घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:21 IST

Rickshaw license policy ,RTO, nagpur news राज्य सरकारने २०१७ मध्ये ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण स्वीकारल्यानंतर, २० वर्षानंतर पहिल्यांदाच रिक्षा परवाना खुल्या पद्धतीने देण्यात आले. परंतु या तीन वर्षांतच नागपुरातील ऑटोरिक्षांची संख्या १० हजारावरून जवळपास ३० हजारांवर पोहचली.

ठळक मुद्देआरटीओ अधिकाऱ्यांचे मागितले मत ३० हजारावर ऑटोरिक्षा, पार्किंगचा उडाला गोंधळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने २०१७ मध्ये ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण स्वीकारल्यानंतर, २० वर्षानंतर पहिल्यांदाच रिक्षा परवाना खुल्या पद्धतीने देण्यात आले. परंतु या तीन वर्षांतच नागपुरातील ऑटोरिक्षांची संख्या १० हजारावरून जवळपास ३० हजारांवर पोहचली. रस्त्यावर वाढत असलेल्या ऑटारिक्षांची संख्या, पार्किंग समस्या आदींमुळे हे धोरण मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांचे मत मागितले आहे.

राज्य शासनाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी अधिसूचना काढून नागपूरसह मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर आणि औरंगाबाद शहरातील ऑटोंची संख्या मर्यादित केली होती. या अधिसूचनेनुसार त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ऑटोरिक्षापेक्षा जास्त परवाने देता येऊ शकत नव्हते. परिणामी, अनधिकृत ऑटोरिक्षांचे प्रमाण वाढले. अधिकृत आणि अनधिकृत ऑटोचालक असा नवा संघर्ष उभा राहिला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी नागपूर शहरात सुमारे ९५०० अधिकृत ऑटो असताना अनधिकृत ऑटोंची संख्या त्यापेक्षा दुपटीच्या घरात गेली होती. याच दरम्यान एका गैरशासकीय संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेऊन ऑटो परवान्यांची संख्या वाढविण्याची विनंती केली. अखेर शासनाने नोव्हेंबर १९९७ची अधिसूचना मागे घेत ऑटोपरवान्याची मर्यादा हटवली. यामुळे कुणालाही ऑटोपरवाना घेणे शक्य झाले. मागील तीन वर्षांत ऑटोंची संख्या वाढून ३० ते ३५ हजाराच्या घरात गेली. परिणामी, रस्त्यावरील वाहतुकीपासून ते पार्किंगचा प्रश्न निर्माण झाल्याचे पुढे आले. यामुळे की काय, मागेल त्याला रिक्षा परवाना धोरण मागे घेण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यातूनच आरटीओ अधिकाऱ्यांना या संदर्भातील मत मागण्यात आले आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी टाळले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा