शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मागेल त्याला रिक्षा परवाना धोरण मागे घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:21 IST

Rickshaw license policy ,RTO, nagpur news राज्य सरकारने २०१७ मध्ये ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण स्वीकारल्यानंतर, २० वर्षानंतर पहिल्यांदाच रिक्षा परवाना खुल्या पद्धतीने देण्यात आले. परंतु या तीन वर्षांतच नागपुरातील ऑटोरिक्षांची संख्या १० हजारावरून जवळपास ३० हजारांवर पोहचली.

ठळक मुद्देआरटीओ अधिकाऱ्यांचे मागितले मत ३० हजारावर ऑटोरिक्षा, पार्किंगचा उडाला गोंधळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने २०१७ मध्ये ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण स्वीकारल्यानंतर, २० वर्षानंतर पहिल्यांदाच रिक्षा परवाना खुल्या पद्धतीने देण्यात आले. परंतु या तीन वर्षांतच नागपुरातील ऑटोरिक्षांची संख्या १० हजारावरून जवळपास ३० हजारांवर पोहचली. रस्त्यावर वाढत असलेल्या ऑटारिक्षांची संख्या, पार्किंग समस्या आदींमुळे हे धोरण मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांचे मत मागितले आहे.

राज्य शासनाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी अधिसूचना काढून नागपूरसह मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर आणि औरंगाबाद शहरातील ऑटोंची संख्या मर्यादित केली होती. या अधिसूचनेनुसार त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ऑटोरिक्षापेक्षा जास्त परवाने देता येऊ शकत नव्हते. परिणामी, अनधिकृत ऑटोरिक्षांचे प्रमाण वाढले. अधिकृत आणि अनधिकृत ऑटोचालक असा नवा संघर्ष उभा राहिला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी नागपूर शहरात सुमारे ९५०० अधिकृत ऑटो असताना अनधिकृत ऑटोंची संख्या त्यापेक्षा दुपटीच्या घरात गेली होती. याच दरम्यान एका गैरशासकीय संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेऊन ऑटो परवान्यांची संख्या वाढविण्याची विनंती केली. अखेर शासनाने नोव्हेंबर १९९७ची अधिसूचना मागे घेत ऑटोपरवान्याची मर्यादा हटवली. यामुळे कुणालाही ऑटोपरवाना घेणे शक्य झाले. मागील तीन वर्षांत ऑटोंची संख्या वाढून ३० ते ३५ हजाराच्या घरात गेली. परिणामी, रस्त्यावरील वाहतुकीपासून ते पार्किंगचा प्रश्न निर्माण झाल्याचे पुढे आले. यामुळे की काय, मागेल त्याला रिक्षा परवाना धोरण मागे घेण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यातूनच आरटीओ अधिकाऱ्यांना या संदर्भातील मत मागण्यात आले आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी टाळले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा