शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST

रामटेक : पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या मायनर रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातून काचुरवाही-मसला मायनर गावालगत गेला आहे. ईश्वर चरडे ते ...

रामटेक : पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या मायनर रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातून काचुरवाही-मसला मायनर गावालगत गेला आहे. ईश्वर चरडे ते राजेंद्र धुर्वे यांच्या घरापर्यंत काही नागरिकांनी या मायनरलगत अतिक्रमण केले असून, काहींनी त्यात पाइपद्वारे घरामधील सांडपाणी सोडले आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येत आहे. याबाबत लोकमतला वृत्त येताच पाटबंधारे विभागाने जागा रिकामी करण्याची नोेटीस अतिक्रमणधारकांना दिली. नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे उपअभियंता धोटे यांनी सांगितले. काही नागरिकांनी मायनरच्या परिसरात अतिक्रमण करून तिथे टिनाचे शेड तयार करून गोठे तयार केले आहेत. काहींनी लाकडांचा ठीग ठेवला आहे. काही जण त्या जागेचा वापर गुरे बांधण्याकरिता करतात. यावर कळस म्हणजे काहींनी त्याच्या घरांमधील सांडपाणी पाइपद्वारे चक्क या मायनरमध्ये सोडले आहे. याच परिसरात व मायनरमध्ये काटेरी झुडपे वाढली आहेत. या मायनरद्वारे परिसरातील शेतामध्ये सिंचनासाठी पाणी पुरवले जाते. देखभाल दुरुस्ती व साफसफाईअभावी हा मायनर बुजल्यागत झाला आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी या मायनरद्वारे शेतापर्यंत पोहोचण्याची ही शक्यता मावळली आहे. धानाचे पीक आणि बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली जात आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही. अतिक्रमण झाल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधून-मधून कालवा मायनरची पाहणी करीत असल्याने त्यांना या अतिक्रमणाबाबत माहिती आहे; परंतु ते हटविण्याबाबत व अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यात पुढाकार घेत नाही. यासंदर्भात लोकमतने सिंचन विभागाचे लक्ष वेधले होते. शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, तसेच नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास संपवण्यासाठी या मायनरच्या परिसरात अतिक्रमण हटवावे तसेच मायनरची साफसफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; पण याबाबत नोटीस मिळाली नसल्याचे काहींनी सांगितले.