शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी ...

नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी देशभरातून २.५ कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु रेल्वे प्रशासनाला ही भरती प्रक्रिया अजूनही राबविता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे एनटीपीसी (नॉन टेक्निकल पाॅप्युलर कॅटॅगिरी) आणि आर. आर. सी. (रेल्वे रिक्रुटमेंट सेल) ने ग्रुप-डी पदाच्या परीक्षेकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांकडून ५०० रुपये, तर मागासवर्गीय विद्यार्थांकडून २५० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. भरतीसंदर्भातील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने मागील वर्षी विद्यार्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करून ट्विटरद्वारे हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी ‘एनटीपीसी’ची परीक्षा जाहीर करून २८ डिसेंबर २०२०ला परीक्षेचा पहिला टप्पा सुरू केला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे काही टप्पे रद्दही करण्यात आले. परंतु आर. आर. सी.च्या ग्रुप-डी भरतीसंदर्भात कुठलेही नवीन नोटीफिकेशन अजूनही देण्यात आले नाही. सध्या आर. आर. बी.च्या साईटवर काहीच अपडेटेड नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात कुठलीही नवीन माहिती मिळत नाही. दोन वर्षे उलटूनही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात येऊन दोन वर्षे लोटली. रेल्वे प्रशासनामार्फत कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे. भरतीसंदर्भातील लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी रक्षा टेंभुर्णे, इशांत सहारे, अमोल गणवीर, सन्नी दमके, धीरज आकरे, अमन रामटेके, आशिष आवळे, निखिल रामटेके, शशिकांत राऊत, शिवम घरडे, रोहित नंदेश्वर, आशिष राऊत, चिंटू मेश्राम, उमेश डोंगरे, नीलेश नंदेश्वर, आतीष नाईक, पियुष मेश्राम या परीक्षार्थींनी केली आहे.

- जाहिरात निघाल्यापासून आतापर्यंत या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे अपेक्षित होते. परंतु रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या भरती प्रक्रियेला तीन वर्षे लागत असतील तर त्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. रेल्वे प्रशासनाने भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलनाकरिता आमची तयारी आहे.

-सुबोध चहांदे, विद्यार्थी प्रतिनिधी