शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

दोन वर्षांपासून विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी ...

नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी देशभरातून २.५ कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु रेल्वे प्रशासनाला ही भरती प्रक्रिया अजूनही राबविता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे एनटीपीसी (नॉन टेक्निकल पाॅप्युलर कॅटॅगिरी) आणि आर. आर. सी. (रेल्वे रिक्रुटमेंट सेल) ने ग्रुप-डी पदाच्या परीक्षेकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांकडून ५०० रुपये, तर मागासवर्गीय विद्यार्थांकडून २५० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. भरतीसंदर्भातील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने मागील वर्षी विद्यार्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करून ट्विटरद्वारे हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी ‘एनटीपीसी’ची परीक्षा जाहीर करून २८ डिसेंबर २०२०ला परीक्षेचा पहिला टप्पा सुरू केला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे काही टप्पे रद्दही करण्यात आले. परंतु आर. आर. सी.च्या ग्रुप-डी भरतीसंदर्भात कुठलेही नवीन नोटीफिकेशन अजूनही देण्यात आले नाही. सध्या आर. आर. बी.च्या साईटवर काहीच अपडेटेड नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात कुठलीही नवीन माहिती मिळत नाही. दोन वर्षे उलटूनही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात येऊन दोन वर्षे लोटली. रेल्वे प्रशासनामार्फत कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे. भरतीसंदर्भातील लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी रक्षा टेंभुर्णे, इशांत सहारे, अमोल गणवीर, सन्नी दमके, धीरज आकरे, अमन रामटेके, आशिष आवळे, निखिल रामटेके, शशिकांत राऊत, शिवम घरडे, रोहित नंदेश्वर, आशिष राऊत, चिंटू मेश्राम, उमेश डोंगरे, नीलेश नंदेश्वर, आतीष नाईक, पियुष मेश्राम या परीक्षार्थींनी केली आहे.

- जाहिरात निघाल्यापासून आतापर्यंत या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे अपेक्षित होते. परंतु रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या भरती प्रक्रियेला तीन वर्षे लागत असतील तर त्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. रेल्वे प्रशासनाने भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलनाकरिता आमची तयारी आहे.

-सुबोध चहांदे, विद्यार्थी प्रतिनिधी