शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या कंत्राटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याचा सर्वत्र गाैरव झाला. परंतु या कर्मचाऱ्यांना आता २० दिवसांच्या वेतनासाठी आराेग्य विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. इकडून पत्र यायचे आहे, तिकडून पैसे यायचे आहे, अशा उत्तराशिवाय त्यांच्या हाती काहीच लागले नाही. धाेका पत्करत सेवा देऊनसुद्धा वेतनासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याने प्रशासनाची ही भूमिका काेविड याेद्धांच्या सेवाकार्याचा अवमान करणारी ठरत आहे.

भिवापूर येथे काेविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर तेथे बहुतांश कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली गेली. अल्प मानधनावर या कर्मचाऱ्यांनी काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसेवा दिली. मात्र दुसरी लाट ओसरताच या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले. या विराेधात कर्मचाऱ्यांनी आंदाेलनही केले हाेते.

१ ऑगस्टला कार्यमुक्त केल्यानंतर २० ऑगस्टपर्यंत या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र काेविड सेंटरमधील चार परिचारिका, एक प्रयाेगशाळा तंत्रज्ञ अशा पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २० दिवसाचे वेतन रखडले आहे. हे वेतन मिळविण्यासाठी कर्मचारी आराेग्य विभागाला साकडे घालत आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालय व तालुका आराेग्य विभाग केवळ एकमेकांकडे बाेट दाखवून जबाबदारी झटकत आहे. दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्याकडून याबाबत पत्र मिळाले नसल्याचेही कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ. दर्शना गणवीर यांच्याशी संपर्क साधला असता, हाेऊ शकला नाही.

.......

तर पुन्हा सेवा देणार काय?

आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेले सर्वत्र कंत्राटी कर्मचारी काेराेनापूर्वी कुठे ना कुठे खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत हाेते. काेराेना काळात आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव होता. त्यामुळे वेगवेगळी प्रलाेभने दाखवून या कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर कोविड सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आले. काेराेना संकटकाळात सेवाभाव कधी ना कधी कामात येईल, या अपेक्षेने कर्मचारी सेवा देण्यास तयार झाले. मात्र काेराेना नियंत्रणात येताच त्यांना अनुभव प्रमाणपत्र, सत्कार आणि अल्प मानधन देत कार्यमुक्त केले. हा कटू अनुभव पाहता, संभाव्य तिसऱ्या लाटेत पुन्हा शासकीय विभागात हे कर्मचारी कंत्राटी सेवा देणार काय, हा प्रश्नच आहे.