शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महाराजबागेतील ‘जान’ला जोडीदाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:48 IST

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे सध्या फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीतही राज्यातील कोणत्याही वन क्षेत्रातून रेस्क्यू केलेला वाघ येथे आणला जाऊ शकतो. गोरेवाडामध्ये वाघ ठेवण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मात्र महाराजबागेतील ‘जान’ नावाची वाघीण जोडीदारासाठी व्याकूळ आहे.

ठळक मुद्देगोरेवाडा बचाव केंद्रात एनटी-१ दाखल : नवा वाघ आल्याने पिंजरे हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे सध्या फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीतही राज्यातील कोणत्याही वन क्षेत्रातून रेस्क्यू केलेला वाघ येथे आणला जाऊ शकतो. गोरेवाडामध्ये वाघ ठेवण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मात्र महाराजबागेतील ‘जान’ नावाची वाघीण जोडीदारासाठी व्याकूळ आहे. मागील अनेक वर्षांपासून ती एकटीच असून, तिच्या दोन बहिणींपैकी एक ‘ली’ हिला गोरेवाडा केंद्रात ब्रीडिंगसाठी पाठविण्यात आले. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. जानला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन राज्याच्या वन विभागाकडे आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे.गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये बिबट्यांसाठी २०, अस्वलींसाठी ५ आणि वाघांसाठी १० पिंजरे आहेत. गोरेवाडामध्ये ११ जूनला ताडोबा येथून एक वाघ केटी-१ आणि २२ जूनला नागभीडमधून वाघीण आणल्याने ही संख्या वाढून ११ झाली. वाघांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाली होती. मात्र केटी-१ चा २२ जूनला आणि नागभीडवरून आणलेल्या वाघिणीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. यामुळे सध्या गोरेवाडामध्ये ९ वाघ राहिले आहेत. मात्र एखादा वाघ उपचारासाठी आणल्यावर येथील संख्या वाढणार आहे. दरम्यान, महाराजबागेमध्ये असलेल्या जान या वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. विशेषज्ञांच्या मते, प्रजनन क्षमतेसाठी तिच्याकडे आता फार कमी दिवस आहेत. महाराजबाग व्यवस्थापनाने आजवर मुख्यालय व एफडीसीएमकडे तीन पत्रे लिहून ही स्थिती कळविली आहे. अलीकडेच १६ जूनलाही त्यांनी पत्र लिहून वाघ देण्याची मागणी केली आहे. आपण वारंवार विनंती करीत असल्याचे महाराजबागचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितले.क्षमतेपेक्षा अधिक वन्यप्राणीगोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्राणी झाले आहेत. बिबट्यांची संख्या २० वरून २४ झाली आहे. यापैकी मोरगाव येथून आणलेल्या बिबट्याचा २३ जूनला मृत्यू झाला. सध्या २३ बिबट आहेत. अलीकडेच १६ जुलैला अकोल्याच्या पातूर वन परिक्षेत्रामधून आईपासून विभक्त झालेली बिबट्याची चार पिले आणली आहेत. अस्वलांची संख्या १० झाली आहे. यामुळे यातील काही अस्वल आणि बिबट गोरेवाडामध्ये उभारण्यात येत असलेल्या इंडियन सफारी झू क्षेत्रात शिफ्ट करण्याची तयारी केली आहे. यासोबतच उपचारासाठी आणलेल्या हरीण व अन्य प्राण्यांची संख्याही पिंजऱ्यापेक्षा अधिक झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघ