शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रेस्टॉरंटला ग्राहकांची प्रतीक्षा  : लोकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:22 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यवसाय हळूहळू रुळावर येईल, अशी मालकांना अपेक्षा आहे.

ठळक मुद्देव्यवसाय हळूहळू रुळावर येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यवसाय हळूहळू रुळावर येईल, अशी मालकांना अपेक्षा आहे.

नागपुरातील धंतोली, सीताबर्डी, व्हेरायटी चौक, रामदासपेठ या भागातील १५ रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची पाहणी केली असता ग्राहकांच्या उपस्थितीची सत्यस्थिती पुढे आली. व्हेरायटी चौकातील पाच ते सहा रेस्टॉरंटमध्ये ग्राहक दिसले नाहीत. धंतोली येथील गणेशसागर, क्रेझी बाईट या रेस्टॉरंटमध्ये एरवीपेक्षा फारच कमी ग्राहक होते. गणेशसागरचे व्यवस्थापक म्हणाले, पूर्वी ८.३० नंतर ग्राहक प्रतीक्षेत राहायचे. पण आता अर्ध्यापेक्षा जास्त टेबल रिक्त आहेत. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मर्यादित कुटुंबे रेस्टॉरंटमध्ये येतात. राज्य शासनाने अनलॉक करताना घोषित केलेल्या ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचे पालन करीत आहेत. पण त्यापेक्षाही कमी ग्राहक येत आहेत. पुढे ग्राहक वाढतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय रामदासपेठ येथील तीन हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते. ग्राहक येण्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार

नागपूर रेशिडेन्सियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील. भीतीमुळे लोक सध्या रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत. शिवाय बाहेरचे लोक नागपुरात येत नसल्याने हॉटेल्समधील रूम्स रिकाम्या आहेत. अनलॉकनंतर रेस्टॉरंटमध्ये अर्धेच कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना हळूहळू बोलविण्यात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे हॉटेल व रेस्टॉरंट कोरोना काळात पूर्णवेळ बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात हॉटेल्स व रेस्टॉरंटला नोटिशी आल्या आहेत. त्यामुळे रात्री १० वाजता रेस्टॉरंट बंद होणार आहे. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील हॉटेल्स व रेस्टॉरंटला प्रॉपर्टी करात एक वर्षाची सूट आणि विजेच्या फिक्स आधार शुल्कात सवलत द्यावी. याशिवाय घोषणेनुसार राज्य शासनाने हॉटेल इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्यावा.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर