शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

रेस्टॉरंटला ग्राहकांची प्रतीक्षा  : लोकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:22 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यवसाय हळूहळू रुळावर येईल, अशी मालकांना अपेक्षा आहे.

ठळक मुद्देव्यवसाय हळूहळू रुळावर येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यवसाय हळूहळू रुळावर येईल, अशी मालकांना अपेक्षा आहे.

नागपुरातील धंतोली, सीताबर्डी, व्हेरायटी चौक, रामदासपेठ या भागातील १५ रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची पाहणी केली असता ग्राहकांच्या उपस्थितीची सत्यस्थिती पुढे आली. व्हेरायटी चौकातील पाच ते सहा रेस्टॉरंटमध्ये ग्राहक दिसले नाहीत. धंतोली येथील गणेशसागर, क्रेझी बाईट या रेस्टॉरंटमध्ये एरवीपेक्षा फारच कमी ग्राहक होते. गणेशसागरचे व्यवस्थापक म्हणाले, पूर्वी ८.३० नंतर ग्राहक प्रतीक्षेत राहायचे. पण आता अर्ध्यापेक्षा जास्त टेबल रिक्त आहेत. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मर्यादित कुटुंबे रेस्टॉरंटमध्ये येतात. राज्य शासनाने अनलॉक करताना घोषित केलेल्या ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचे पालन करीत आहेत. पण त्यापेक्षाही कमी ग्राहक येत आहेत. पुढे ग्राहक वाढतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय रामदासपेठ येथील तीन हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते. ग्राहक येण्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार

नागपूर रेशिडेन्सियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील. भीतीमुळे लोक सध्या रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत. शिवाय बाहेरचे लोक नागपुरात येत नसल्याने हॉटेल्समधील रूम्स रिकाम्या आहेत. अनलॉकनंतर रेस्टॉरंटमध्ये अर्धेच कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना हळूहळू बोलविण्यात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे हॉटेल व रेस्टॉरंट कोरोना काळात पूर्णवेळ बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात हॉटेल्स व रेस्टॉरंटला नोटिशी आल्या आहेत. त्यामुळे रात्री १० वाजता रेस्टॉरंट बंद होणार आहे. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील हॉटेल्स व रेस्टॉरंटला प्रॉपर्टी करात एक वर्षाची सूट आणि विजेच्या फिक्स आधार शुल्कात सवलत द्यावी. याशिवाय घोषणेनुसार राज्य शासनाने हॉटेल इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्यावा.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर