शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

२७ वर्षांपासून सिमेंट बंधाऱ्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:09 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : तालुक्यातील लोणारा येथील तलावाचा मातीचा बांध फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुटलेल्या बंधाऱ्याच्या जागी ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : तालुक्यातील लोणारा येथील तलावाचा मातीचा बांध फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुटलेल्या बंधाऱ्याच्या जागी गत २७ वर्षांपासून नवीन सिमेंट बंधारा बांधावा, याकरिता शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. तरीही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कृषी विभागामार्फत लोणारा गावालगत असलेल्या तांबडा गोटा येथे तलावाची निर्मिती करून मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. यामुळे या तलावात पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचत होते. उन्हाळ्यात साचलेले पाणी उपलब्ध राहत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढत होती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघत होता. सोबतच्या तलावाशेजारी वनविभागामार्फत नर्सरीतून जवळपास दोन लाख रोपट्यांची निर्मिती करण्यात येत होती. परंतु, १९९४ ला झालेल्या मुसळधार पावसाने हा बंधारा फुटला. तेव्हापासून हा तलाव सिमेंट बंधाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.

शासन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे बांधत आहे तसेच जल शिवार अंतर्गत नाला खोलीकरण करीत आहे. परंतु, अगोदरच अस्तित्वात असलेल्या तलावांना नवसंजीवनी देण्यासाठी उपाययोजना नाही, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोल जात असून, भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. याकरिता जुन्या तलावांच्या नवनिर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

-

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

- तलाव गावालगत असून, त्याला लागूनच जंगल परिसर आहे. या तलावावर रात्रीच्या वेळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी यायचे. परंतु, २७ वर्षांपासून या तलावात पाणीच राहत नसल्याने वन्यजीव शेतशिवारात पाण्यासाठी भटकताना दिसतात. ते शेतात पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडीसुद्धा करतात.