शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

२७ वर्षांपासून सिमेंट बंधाऱ्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:09 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : तालुक्यातील लोणारा येथील तलावाचा मातीचा बांध फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुटलेल्या बंधाऱ्याच्या जागी ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : तालुक्यातील लोणारा येथील तलावाचा मातीचा बांध फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुटलेल्या बंधाऱ्याच्या जागी गत २७ वर्षांपासून नवीन सिमेंट बंधारा बांधावा, याकरिता शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. तरीही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कृषी विभागामार्फत लोणारा गावालगत असलेल्या तांबडा गोटा येथे तलावाची निर्मिती करून मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. यामुळे या तलावात पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचत होते. उन्हाळ्यात साचलेले पाणी उपलब्ध राहत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढत होती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघत होता. सोबतच्या तलावाशेजारी वनविभागामार्फत नर्सरीतून जवळपास दोन लाख रोपट्यांची निर्मिती करण्यात येत होती. परंतु, १९९४ ला झालेल्या मुसळधार पावसाने हा बंधारा फुटला. तेव्हापासून हा तलाव सिमेंट बंधाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.

शासन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे बांधत आहे तसेच जल शिवार अंतर्गत नाला खोलीकरण करीत आहे. परंतु, अगोदरच अस्तित्वात असलेल्या तलावांना नवसंजीवनी देण्यासाठी उपाययोजना नाही, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोल जात असून, भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. याकरिता जुन्या तलावांच्या नवनिर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

-

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

- तलाव गावालगत असून, त्याला लागूनच जंगल परिसर आहे. या तलावावर रात्रीच्या वेळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी यायचे. परंतु, २७ वर्षांपासून या तलावात पाणीच राहत नसल्याने वन्यजीव शेतशिवारात पाण्यासाठी भटकताना दिसतात. ते शेतात पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडीसुद्धा करतात.