शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

प्रश्नपत्रिकेसाठी दोन तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत.

ठळक मुद्देतांत्रिक त्रुटींचा परीक्षार्थ्यांना फटका : महाविद्यालयांकडून ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ला दोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे २ वाजता सुरू होणारा ‘बीकॉम’चा पेपर दीड ते दोन तास उशिरा सुरू झाला. परीक्षा केंद्रांनी या विलंबाचा दोष विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ला दिला आहे.‘बीकॉम’च्या पहिला सत्राचा शनिवारी ‘फायनान्शियल अकाऊंटिंग’चा पेपर होता. दुपारी २ वाजता पेपर सुरू होणार होता. परीक्षा केंद्रांवर १.४५ च्या सुमारास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकादेखील वाटण्यात आल्या. मात्र काही परीक्षा केंद्रांवर २ वाजल्यानंतरदेखील प्रश्नपत्रिकांचा पत्ताच नव्हता. विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यानंतर प्रश्नपत्रिका येण्यास वेळ लागेल. तोपर्यंत बसून रहा, असे सांगण्यात आले. चक्क दीड ते दोन तासांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या. सायंकाळी ५ ला संपणारा पेपर काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालला. हिवाळ्याची सुरुवात असल्याने यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे पालकदेखील चिंतेत पडले होते व अनेक विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी अडचण झाली. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी ही बाब केंद्र अधिकाºयांना सांगितल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आल्या. यासंदर्भात महाविद्यालयांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. प्रश्नपत्रिकांच्या ‘आॅनलाईन डिलीव्हरी’त त्रुटी होत्या. त्यामुळे चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, असा दावा महाविद्यालयांतर्फे करण्यात आला. काही परीक्षा केंद्रावर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली असल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांनी मान्य केली. विलंबाची कारणे शोधण्यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.‘प्रिंटर’ झाले खराब‘पीडब्ल्यूएस’ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर तर भलत्याच कारणामुळे विलंब झाला. परीक्षा केंद्रावरील ‘प्रिंटर’ ऐनवेळी खराब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवर मिळाल्या नाहीत. हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकारदेखील येथे घडला.