शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भरकटलेले स्वर आणि कंटाळलेले रसिक

By admin | Updated: September 17, 2014 00:57 IST

संगीतांच्या कार्यक्रमांबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की, काही कलावंतांसाठी कला सादरीकरण करणे हे त्यांचे पोट आहे.

नागपूर : संगीतांच्या कार्यक्रमांबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की, काही कलावंतांसाठी कला सादरीकरण करणे हे त्यांचे पोट आहे. जगण्यासाठी त्यांच्याजवळ कलाच आहे. पण व्यावसायिकदृष्ट्या कलेच्या सादरीकरणातून रसिकांना आनंद देण्याचा कलावंतांचा प्रयत्न असायला हवा. काही कलावंत हा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. सध्याच्या एकूणच व्यावसायिक वातावरणात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना प्रायोजक शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याला पर्याय नसतो पण प्रायोजक कार्यक्रमाला मदत करताना त्यांच्या कुटुंबीयांना गाण्याची संधी मिळावी, अशी अट टाकतात तेव्हा आयोजकांजवळ इलाज उरत नाही. यामुळे केवळ शेजाऱ्यांच्या कौतुकाचे विषय असलेल्या या तथाकथित गायकांना सहन करण्याची वेळ रसिकांवर येते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.दर्जाहीन कार्यक्रम अन् कंटाळलेले रसिक नागपूर हे रसिकांचे शहर आहे. येथल्या रसिकतेला बालगंधर्वांच्या काळापासून अनेक कलावंतांनी सलाम केला आहे. आवडले तर डोक्यावर घ्यायचे आणि नाही आवडले तर थेट बोलून मोकळे व्हायचे, हा इथल्या रसिकांचा स्वभाव आहे. प्रारंभीच्या काळात आपल्या शहरातील कलावंत म्हणून रसिकांनी गायक कलावंतांचे लाड केले. त्यांच्या चुका समजून घेतल्या आणि गायनाच्या क्षेत्रात समोर जाण्यासाठी गायकांना प्रोत्साहन दिले. पण अनेक गायकांनी प्रेक्षकांना गृहितच धरले आणि त्यांच्या गायनात बदल करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले नाही. त्यामुळे अनेक गायकांच्या गायनात तोचतोचपणा येत राहिला. गाण्यातल्या हरकती, गीतांतील काही नाजूक जागा, आशयपूर्ण आणि भावपूर्ण सादरीकरण हरविले. त्यामुळे हल्ली अनेक कार्यक्रमांची रेलचेल असली तरी रसिक या कार्यक्रमात फारसे रिलेट होऊ शकत नाही. कार्यक्रमाला आलेले अनेक रसिक दोन-चार गीत झाल्यावर काढता पाय घेतात. शहरात संगीताचे अनेक कार्यक्रम होतात पण त्यात सारखेपणा आला आहे. काही संकल्पनांवर कार्यक्रमांचे सादरीकरण होते पण त्या संकल्पनांवर अभ्यासपूर्णता आणि वेगळेपण आणण्याचा प्रयत्न होत नसल्याने रसिकांना त्यात फारशी मजा येत नाही. अनेक हवसे-गवसे गायकही थेट जाहीर कार्यक्रमात भरकटलेल्या स्वरात गातात त्यामुळे रसिक मूळ गाण्यांचा आनंदच विसरत चालले आहे. जाहीर कार्यक्रमात गीतांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून मोठ्या आवडीने येणारे रसिक कार्यक्रम झाल्यावर मात्र नापसंती दर्शवीत आहेत. काही अपवाद वगळता गायकांमध्येही सुधारणा नाहीच. ज्यांना योग्य पद्धतीने गाणे सादर करता येत नाही, संगीताचा अभ्यास नाही आणि गाण्यात माधुर्य आणता येत नाही. अशा गायकांनी खासगी कार्यक्रम करावेत, सार्वजनिक कार्यक्रमात मात्र रसिकांना वेठीस धरू नये, असे मतही रसिकांनी व्यक्त केले आहे. काही लोक केवळ पैशांच्या भरवशावर रसिकांच्या आनंदाचा विचका करतात. त्यामुळे गीतांच्या कार्यक्रमाला जाण्यात रसिकांचा अपेक्षाभंग होतो आहे. याकडे गायकांचे, आयोजकांचे दुर्लक्ष होत असून आता आयोजक संस्थांनी याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याची सूचना या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. अकादमीच्या नावाने चांगभलसध्या शहरात गल्लोगल्ली संगीत क्लासेस, अकादमींची स्थापना करण्यात आली आहे. या संगीत अकादमीत प्रवेश देतानाच संगीताचे प्रशिक्षण देताना अवघ्या महिन्याभरात थेट रंगमंचावर गायन करण्याची संधी देण्याचे आमिष दाखविले जाते. हल्ली प्रत्येकालाच झटपट प्रसिद्धीचा हव्यास असतो. त्यामुळे आपण गायनात किती तयार आहोत, याचा कसलाही विचार न करता नवसे कलावंत आपण गायक असल्याच्या आविर्भावात रंगमंचावर येतात. अशा अकादमी शहरात जास्त संख्येने असणे हे एका दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे अनेक लोक संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहित होतात पण अकादमीत संगीत गांभीर्याने शिकविले गेले पाहिजे. गायकांच्या तयारीसाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि जोपर्यंत गायक तयार होत नाही तोपर्यंत त्याला रंगमंचावर जाहीर कार्यक्रमात गीत सादर करण्यापासून थांबविले पाहिजे. अशा गायकांना संधी देताना जाहीर कार्यक्रमात संधी देण्यापेक्षा अकादमीच्या अंतर्गत कार्यक्रमात प्रोत्साहन म्हणून गायनाची संधी देणे समजता येण्यासारखे आहे. पण जाहीर आणि व्यावसायिक कार्यक्रमात गायनाची समज नसणाऱ्या गायकांना स्थान देणे प्रेक्षकांवर अन्याय करणारे आहे. थेट जाहीर कार्यक्रमात संधी देण्याचे आमिष दाखवून अकादमी केवळ आपला व्यवसाय पाहते. तो पाहायला हरकत नाही पण त्यासाठी प्रेक्षकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न अशा अकादमींनी करायला नको, अशाही प्रतिक्रिया या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आल्यात. (लोकमत चमू)