शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सुरक्षेमुळे स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही; सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 22:13 IST

Nagpur News या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही ही खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

नागपूर :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र सरकारतर्फे झेड प्लस सुरक्षा मिळालेली आहे. या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना त्यांना सहजपणे भेटता येत नाही. ही खंत केवळ सर्वसामान्य स्वयंसेवकांचीच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा हीच खंत असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिवंगत डॉ. श्रीकांत उपाख्य राजाभाऊ शिलेदार यांच्या निधनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवाजीनगर शाखेतर्फे शंकरनगर येथील साई सभागृहात सोमवारी ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विवेकानंद मेडिकल मिशन खापरीचे श्रीकांत अंधारे, रमेश शिलेदार व अजय शिलेदार व्यासपीठावर होते.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिवंगत डॉ. श्रीकांत उपाख्य राजाभाऊ शिलेदार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा सादर करीत त्यांच्या कार्यापासून आजच्या स्वयंसेवकाने प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. राजाभाऊ हे स्पष्टपणे बोलायचे. असाच एक किस्सा सांगताना भागवत म्हणाले, एकदा राजाभाऊ सुरक्षेच्या मुद्यावरून म्हणाले, आता सरसंघचालकांना सहजपणे भेटताही येत नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ही सर्व काही (सुरक्षा) मी मागून घेतलेली नाही. ती माझ्या गळ्यात पडली. मी सोडतो म्हटले तरी ते झाले नाही. त्यांनी माझी बाजू समजून घेतली. त्यांच्या मनासारखे झाले नाही म्हणून त्यांनी कधी ढिंढोरा पिटला नाही.

मुळात आहे तशा परिस्थितीत काम करीत राहणे हीच संघाची शिकवण व पद्धत आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. संचालन विनय मोडक यांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत