शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपसाठी विवेक ओबेरॉय व स्मृती इराणी मैदानात

By admin | Updated: October 13, 2014 01:12 IST

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे

नागपुरातील उमेदवारांचा प्रचार : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहननागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी केले. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील भेंडे ले-आऊ ट येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाले, येथील रेशीमबागच्या पाण्यात जादू असून त्यात दिल्लीतील सत्ता हलविण्याची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला ६-७ जागा मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज होता. परंतु सर्वच्यासर्व १० जागांवर विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात स्पष्ट बहुमतात भाजपचे सरकार सत्तेत आले. आता तसेच महाराष्ट्रातही परिवर्तन घडवून आणा व भाजपच्या हातात सत्ता द्या. महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला १५०ते १६० मिळतील. भाजपची स्वबळावर सत्ता आल्यास गुजरातप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास होईल, असा विश्वास ओबेरॉय यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल सोले यांनीही मार्गदर्शन केले. मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, किशोर वानखेडे, नितीन तेलगोटे, विजय राऊ त आदी व्यासपीठावर उपस्थित होते.जाटतरोडी येथे आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी म्हणाल्या, महाराष्ट्र गत १५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. परंतु आता येत्या १५ आॅक्टोबर रोजी तो संपणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन हवे आहे. तीच परमेश्वराची इच्छा आहे. निवडणुकीनंतर लगेच दिवाळी उत्सव सुरू होणार आहे. यंदाच्या या उत्सवात लक्ष्मी ही कमळावर बसून घरोघरी येणार आहे. यावर्षीची दिवाळी ही लोकशाहीची दिवाळी राहणार आहे.राजकारण हे सेवेचे माध्यम बनले पाहिजे. भाजपची सत्ता येणार असल्याने सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चिंतेत पडले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व दक्षिण-पश्चिम विधानभा मतदार संघातील भाजप उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या सुलेखा कुुंभारे व संदीप जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)