शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

By admin | Updated: February 20, 2016 03:30 IST

व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही.

दिलीप चौधरी : मराठा सेवा संघातर्फे शिवजयंती उत्सवनागपूर : व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही. ज्यावेळी आपल्या हाती धुपाटणेच राहते त्यावेळी मात्र आपण फसविले गेल्याचे लक्षात येते. तथाकथित व्यवस्था माणसांच्या मेंदूचा ताबा घेते आणि विवेकाने विचार करण्याची वृत्ती थांबविली जाते. शिवचरित्र मात्र आपल्याला डोळस करते आणि आपला विवेक जागृत करते. त्यामुळेच आजच्या काळातही शिवचरित्र अभ्यासण्याची गरज ३५० वर्षानंतर वाटते आहे, असे मत शिवसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त एका महोत्सवाचे आयोजन मराठा सेवा संघ लॉन, सुर्वेनगर येथे केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चौधरी ‘बदलत्या परिस्थितीत शिवचरित्राची भूमिका’ विषयावर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक अरबट, डॉ. निकुंज पवार, उत्तमराव सुळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. जी. येवले, श्रीमंत कोकाटे, प्रभाकर देशमुख, आ. सुनील केदार, अविनाश काकडे, प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम कडू, दिनेश ठाकरे, रामकृष्ण ठेंगडी, अनिता वानखेडे, जमाते इस्लामीचे अध्यक्ष उमरखान, गिरधर मरडिया, उमेशबाबू चौबे उपस्थित होते. दिलीप चौधरी म्हणाले, महाराजांनी उपयोगात आणलेली शस्त्रे आता संग्रहालयात असली तरी त्यांचे विचार मात्र सार्वत्रिक आहेत. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रातून सापडतात. आपण इतिहासाची शिकवण विसरलो त्यामुळेच अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मात्र जाणीवपूर्वक बहुजनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना इतिहास चुकीचा लिहिला गेला. लोकशाही सरकारच्या निर्णयावर उद्योजकांचा प्रभाव वाढतो आहे. अशा वेळी शिवचरित्रातून आपला विवेक आणि सद्बुद्धी जागृत होते, असे सांगताना त्यांनी काही उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. अविनाश काकडे म्हणाले, संभाजीला औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिली. त्याला मनुस्मृती माहीत नव्हती. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी शिवाजींची प्रतिमा करण्यात आली पण त्यात तथ्य नाही. श्रीमंत कोकाटे म्हणाले, महाराजांनी रयतेचे राज्य केले. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा लढा मुस्लिमांविरुद्ध नव्हताच. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास त्यांचे गुरु नव्हते. पण जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास आपल्यावर लादला गेला. त्यांच्या अनुयायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा घाट घातला गेला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नाहीत. शासनानेही महाराजांची अर्थव्यवस्था तपासून पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर आणि सविता कराळ यांनी केले. प्रास्ताविक विनोद खोडके यांनी केले. प्रारंभी आदित्य लोहे यांनी ‘सह्याद्रीचा छावा’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद वैद्य, विजय बेले, प्रशांत कोहळे, अशोक डहाके, अभिजित दळवी, नितीन ठवकर, श्याम डहाके आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)