शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

By admin | Updated: February 20, 2016 03:30 IST

व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही.

दिलीप चौधरी : मराठा सेवा संघातर्फे शिवजयंती उत्सवनागपूर : व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही. ज्यावेळी आपल्या हाती धुपाटणेच राहते त्यावेळी मात्र आपण फसविले गेल्याचे लक्षात येते. तथाकथित व्यवस्था माणसांच्या मेंदूचा ताबा घेते आणि विवेकाने विचार करण्याची वृत्ती थांबविली जाते. शिवचरित्र मात्र आपल्याला डोळस करते आणि आपला विवेक जागृत करते. त्यामुळेच आजच्या काळातही शिवचरित्र अभ्यासण्याची गरज ३५० वर्षानंतर वाटते आहे, असे मत शिवसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त एका महोत्सवाचे आयोजन मराठा सेवा संघ लॉन, सुर्वेनगर येथे केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चौधरी ‘बदलत्या परिस्थितीत शिवचरित्राची भूमिका’ विषयावर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक अरबट, डॉ. निकुंज पवार, उत्तमराव सुळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. जी. येवले, श्रीमंत कोकाटे, प्रभाकर देशमुख, आ. सुनील केदार, अविनाश काकडे, प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम कडू, दिनेश ठाकरे, रामकृष्ण ठेंगडी, अनिता वानखेडे, जमाते इस्लामीचे अध्यक्ष उमरखान, गिरधर मरडिया, उमेशबाबू चौबे उपस्थित होते. दिलीप चौधरी म्हणाले, महाराजांनी उपयोगात आणलेली शस्त्रे आता संग्रहालयात असली तरी त्यांचे विचार मात्र सार्वत्रिक आहेत. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रातून सापडतात. आपण इतिहासाची शिकवण विसरलो त्यामुळेच अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मात्र जाणीवपूर्वक बहुजनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना इतिहास चुकीचा लिहिला गेला. लोकशाही सरकारच्या निर्णयावर उद्योजकांचा प्रभाव वाढतो आहे. अशा वेळी शिवचरित्रातून आपला विवेक आणि सद्बुद्धी जागृत होते, असे सांगताना त्यांनी काही उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. अविनाश काकडे म्हणाले, संभाजीला औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिली. त्याला मनुस्मृती माहीत नव्हती. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी शिवाजींची प्रतिमा करण्यात आली पण त्यात तथ्य नाही. श्रीमंत कोकाटे म्हणाले, महाराजांनी रयतेचे राज्य केले. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा लढा मुस्लिमांविरुद्ध नव्हताच. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास त्यांचे गुरु नव्हते. पण जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास आपल्यावर लादला गेला. त्यांच्या अनुयायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा घाट घातला गेला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नाहीत. शासनानेही महाराजांची अर्थव्यवस्था तपासून पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर आणि सविता कराळ यांनी केले. प्रास्ताविक विनोद खोडके यांनी केले. प्रारंभी आदित्य लोहे यांनी ‘सह्याद्रीचा छावा’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद वैद्य, विजय बेले, प्रशांत कोहळे, अशोक डहाके, अभिजित दळवी, नितीन ठवकर, श्याम डहाके आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)