शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:32 IST

शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.

ठळक मुद्देमनपा सफाई कर्मचाऱ्याचे असेही ध्येय : २९ दिवसात ४००० किमीचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या ध्येयाने पछाडलेला माणूस ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. त्यानेही एक ध्येय मनात बाळगले होते. या मायभूमीच्या एकेका कानाकोपऱ्याला भेटायचे आणि तेही सायकलने प्रवास करून. या भटकंतीची संकल्पना होती, शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत हा ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.दिलीप मलिक गुरुवारीच त्यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून नागपूरला पोहचले तेव्हा लोकमतशी त्यांनी संवाद साधला. दिलीप मलिक नागपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सायकल ही त्यांचे जीव की प्राण. सायकलस्वारी हा वडिलांकडून त्यांना मिळालेला वारसा आहे. कुठलाही प्रवास सायकलने करायचा, हे त्यांचे ठरलेले. सायकलने भटकंती करण्याची आसक्ती वयाच्या सातव्या वर्षापासून लागली ती आजही कायम आहे. अशी भटकंती करीत ४० वर्षात त्यांनी ५ लाख ८४ हजार किमीचा प्रवास सायकलने केला आहे. यावर्षी सायकलने देशाचा टप्पाटप्पा गाठायचा, हे उद्दिष्ट त्यांनी मनात बाळगले. मनपा प्रशासनाकडून परवानगी घेतली. त्यांच्या प्रवासासाठी महापालिकेने त्यांना नवीन स्पोर्टी सायकलही दिली. १५ आॅगस्ट रोजी त्यांचा हा प्रवास महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत व्हेरायटी चौक येथून सुरू झाला. त्यांच्यासोबत रामेश्वर चव्हाण हा तरुण सहकारीही प्रवासाला निघाला. ‘शहीद जवानांचा सन्मान, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लावा-वृक्ष जगवा’ हा संदेश देत ते प्रवासाला लागले. पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व काश्मीर या राज्यातून प्रवास करीत वाघा बॉर्डरवर समारोप झाला. यादरम्यान उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज १५० ते २०० किमीचा प्रवास करीत त्यांनी हा टप्पा गाठला. खांद्यावर आवश्यक साहित्य होते पण भोजनाची व्यवस्था रात्री मुक्कामाच्या ठिकाणी होत असे. काश्मीरच्या लेह लद्दाख भागात अंगावर थरकाप आणणाºया एका विपरीत प्रसंगाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. असे अनेक प्रसंग पार करीत १३ सप्टेंबर रोजी वाघा बॉर्डरवर प्रवासाच्या या टप्प्याची सांगता झाली.सायकलवर १९ तिरंगा ध्वजदिलीप मलिक यांनी त्यांची सायकल अनोख्या पद्धतीने सजविली होती. समोर बॅटरी व संदेशाचे फलक आणि मागे मोराचा पिसारा फुलावा तसे १९ तिरंगा ध्वज त्यांनी सजविले होते. हवेत डोलणारे हे ध्वज पाहून वाटेतील लोक आवर्जून विचारपूस करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गात बहुतेक ठिकाणी लोकांनीच भोजनाची व इतर व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.पुढच्या वर्षी ४५ हजार किमीचे लक्ष्यदिलीप मलिक यांनी यापूर्वीच संपूर्ण भारताच्या बहुतेक भागाला सायकलने भेट दिली आहे परंतु हा प्रवास एखादे लक्ष्य ठरवून टप्प्याटप्प्याने झाला. यातून केवळ राजस्थान व नेपाळचा भाग सुटल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच २०२० मध्ये ४५ हजार किलोमीटरचे लक्ष्य ठेवत एकाच वेळी संपूर्ण भारताचे भ्रमण करण्याचे ध्येय त्यांनी निर्धारीत केले असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.

टॅग्स :CyclingसायकलिंगIndiaभारत