शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:32 IST

शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.

ठळक मुद्देमनपा सफाई कर्मचाऱ्याचे असेही ध्येय : २९ दिवसात ४००० किमीचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या ध्येयाने पछाडलेला माणूस ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. त्यानेही एक ध्येय मनात बाळगले होते. या मायभूमीच्या एकेका कानाकोपऱ्याला भेटायचे आणि तेही सायकलने प्रवास करून. या भटकंतीची संकल्पना होती, शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत हा ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.दिलीप मलिक गुरुवारीच त्यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून नागपूरला पोहचले तेव्हा लोकमतशी त्यांनी संवाद साधला. दिलीप मलिक नागपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सायकल ही त्यांचे जीव की प्राण. सायकलस्वारी हा वडिलांकडून त्यांना मिळालेला वारसा आहे. कुठलाही प्रवास सायकलने करायचा, हे त्यांचे ठरलेले. सायकलने भटकंती करण्याची आसक्ती वयाच्या सातव्या वर्षापासून लागली ती आजही कायम आहे. अशी भटकंती करीत ४० वर्षात त्यांनी ५ लाख ८४ हजार किमीचा प्रवास सायकलने केला आहे. यावर्षी सायकलने देशाचा टप्पाटप्पा गाठायचा, हे उद्दिष्ट त्यांनी मनात बाळगले. मनपा प्रशासनाकडून परवानगी घेतली. त्यांच्या प्रवासासाठी महापालिकेने त्यांना नवीन स्पोर्टी सायकलही दिली. १५ आॅगस्ट रोजी त्यांचा हा प्रवास महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत व्हेरायटी चौक येथून सुरू झाला. त्यांच्यासोबत रामेश्वर चव्हाण हा तरुण सहकारीही प्रवासाला निघाला. ‘शहीद जवानांचा सन्मान, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लावा-वृक्ष जगवा’ हा संदेश देत ते प्रवासाला लागले. पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व काश्मीर या राज्यातून प्रवास करीत वाघा बॉर्डरवर समारोप झाला. यादरम्यान उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज १५० ते २०० किमीचा प्रवास करीत त्यांनी हा टप्पा गाठला. खांद्यावर आवश्यक साहित्य होते पण भोजनाची व्यवस्था रात्री मुक्कामाच्या ठिकाणी होत असे. काश्मीरच्या लेह लद्दाख भागात अंगावर थरकाप आणणाºया एका विपरीत प्रसंगाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. असे अनेक प्रसंग पार करीत १३ सप्टेंबर रोजी वाघा बॉर्डरवर प्रवासाच्या या टप्प्याची सांगता झाली.सायकलवर १९ तिरंगा ध्वजदिलीप मलिक यांनी त्यांची सायकल अनोख्या पद्धतीने सजविली होती. समोर बॅटरी व संदेशाचे फलक आणि मागे मोराचा पिसारा फुलावा तसे १९ तिरंगा ध्वज त्यांनी सजविले होते. हवेत डोलणारे हे ध्वज पाहून वाटेतील लोक आवर्जून विचारपूस करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गात बहुतेक ठिकाणी लोकांनीच भोजनाची व इतर व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.पुढच्या वर्षी ४५ हजार किमीचे लक्ष्यदिलीप मलिक यांनी यापूर्वीच संपूर्ण भारताच्या बहुतेक भागाला सायकलने भेट दिली आहे परंतु हा प्रवास एखादे लक्ष्य ठरवून टप्प्याटप्प्याने झाला. यातून केवळ राजस्थान व नेपाळचा भाग सुटल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच २०२० मध्ये ४५ हजार किलोमीटरचे लक्ष्य ठेवत एकाच वेळी संपूर्ण भारताचे भ्रमण करण्याचे ध्येय त्यांनी निर्धारीत केले असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.

टॅग्स :CyclingसायकलिंगIndiaभारत