शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:32 IST

शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.

ठळक मुद्देमनपा सफाई कर्मचाऱ्याचे असेही ध्येय : २९ दिवसात ४००० किमीचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या ध्येयाने पछाडलेला माणूस ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. त्यानेही एक ध्येय मनात बाळगले होते. या मायभूमीच्या एकेका कानाकोपऱ्याला भेटायचे आणि तेही सायकलने प्रवास करून. या भटकंतीची संकल्पना होती, शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत हा ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय.दिलीप मलिक गुरुवारीच त्यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून नागपूरला पोहचले तेव्हा लोकमतशी त्यांनी संवाद साधला. दिलीप मलिक नागपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सायकल ही त्यांचे जीव की प्राण. सायकलस्वारी हा वडिलांकडून त्यांना मिळालेला वारसा आहे. कुठलाही प्रवास सायकलने करायचा, हे त्यांचे ठरलेले. सायकलने भटकंती करण्याची आसक्ती वयाच्या सातव्या वर्षापासून लागली ती आजही कायम आहे. अशी भटकंती करीत ४० वर्षात त्यांनी ५ लाख ८४ हजार किमीचा प्रवास सायकलने केला आहे. यावर्षी सायकलने देशाचा टप्पाटप्पा गाठायचा, हे उद्दिष्ट त्यांनी मनात बाळगले. मनपा प्रशासनाकडून परवानगी घेतली. त्यांच्या प्रवासासाठी महापालिकेने त्यांना नवीन स्पोर्टी सायकलही दिली. १५ आॅगस्ट रोजी त्यांचा हा प्रवास महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत व्हेरायटी चौक येथून सुरू झाला. त्यांच्यासोबत रामेश्वर चव्हाण हा तरुण सहकारीही प्रवासाला निघाला. ‘शहीद जवानांचा सन्मान, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लावा-वृक्ष जगवा’ हा संदेश देत ते प्रवासाला लागले. पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व काश्मीर या राज्यातून प्रवास करीत वाघा बॉर्डरवर समारोप झाला. यादरम्यान उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज १५० ते २०० किमीचा प्रवास करीत त्यांनी हा टप्पा गाठला. खांद्यावर आवश्यक साहित्य होते पण भोजनाची व्यवस्था रात्री मुक्कामाच्या ठिकाणी होत असे. काश्मीरच्या लेह लद्दाख भागात अंगावर थरकाप आणणाºया एका विपरीत प्रसंगाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. असे अनेक प्रसंग पार करीत १३ सप्टेंबर रोजी वाघा बॉर्डरवर प्रवासाच्या या टप्प्याची सांगता झाली.सायकलवर १९ तिरंगा ध्वजदिलीप मलिक यांनी त्यांची सायकल अनोख्या पद्धतीने सजविली होती. समोर बॅटरी व संदेशाचे फलक आणि मागे मोराचा पिसारा फुलावा तसे १९ तिरंगा ध्वज त्यांनी सजविले होते. हवेत डोलणारे हे ध्वज पाहून वाटेतील लोक आवर्जून विचारपूस करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गात बहुतेक ठिकाणी लोकांनीच भोजनाची व इतर व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.पुढच्या वर्षी ४५ हजार किमीचे लक्ष्यदिलीप मलिक यांनी यापूर्वीच संपूर्ण भारताच्या बहुतेक भागाला सायकलने भेट दिली आहे परंतु हा प्रवास एखादे लक्ष्य ठरवून टप्प्याटप्प्याने झाला. यातून केवळ राजस्थान व नेपाळचा भाग सुटल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच २०२० मध्ये ४५ हजार किलोमीटरचे लक्ष्य ठेवत एकाच वेळी संपूर्ण भारताचे भ्रमण करण्याचे ध्येय त्यांनी निर्धारीत केले असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.

टॅग्स :CyclingसायकलिंगIndiaभारत