शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस; न्यायालयात १०० टक्के प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 07:00 IST

Nagpur News २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली. सायबर गुन्हेदरात नागपूरचा क्रमांक देशात आठवा होता. तर प्रलंबित पोलीस चौकशीची टक्केवारी राज्यात सर्वाधिक होती.

ठळक मुद्देएका वर्षात १०४ टक्क्यांनी वाढले गुन्हेपोलीस चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी राज्यात सर्वाधिक

 योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी बनू लागली आहे. इतर मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीत देखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली. सायबर गुन्हेदरात नागपूरचा क्रमांक देशात आठवा होता. तर प्रलंबित पोलीस चौकशीची टक्केवारी राज्यात सर्वाधिक होती. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. (The ‘virus’ rise of ‘cyber’ crimes in the Nagpur; 100% cases pending in court)

२०२० साली नागपुरात सायबर गुन्ह्यांचे २४३ गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये हाच आकडा ११९ इतका होता. २०२० मधील तब्बल १४१ गुन्हे हे फसवणुकीचे होते, तर २३ गुन्हे महिलांची छळवणूक करण्याचे होते. सोबतच घोटाळ्याच्या ४ गुन्ह्यांची नोंद झाली. विविध गुन्ह्यांसाठी एका महिलेसह एकूण ३९ जणांना अटक करण्यात आली.

पोलीस चौकशीची गती संथच

सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांची चौकशी संथ गतीने होत असल्याचे चित्र असून २०२० साली नागपूरचा प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक होती. पोलिसांकडून चौकशीसाठी २०२० मधील २४३ तर अगोदरची ३०९ प्रकरणे होती. ३० प्रकरणातच आरोपपत्र दाखल होऊ शकले. ८० प्रकरणांतच चौकशी पूर्ण होऊ शकली तर वर्षाअखेरीस ४७१ प्रकरणांत चौकशी प्रलंबित होती. चौकशी प्रलंबित असण्याची टक्केवारी ८५.३ टक्के इतकी होती. ही टक्केवारी राज्यात सर्वात जास्त ठरली. मुंबईचा आकडा ८३.६ टक्के तर पुण्याची टक्केवारी ८२.८ टक्के इतकी होती.

लैंगिक छळवणुकीसाठी ४६ गुन्हे

विविध कारणांमुळे संताप आल्याने सायबर क्राईमचे ७० गुन्हे घडले. तर महिला व मुलींची लैंगिक छळवणूक करण्याचा उद्देश असलेले ४६ गुन्हे दाखल झाले. १०१ प्रकरणांत आरोपींचा उद्देश हा केवळ घोटाळा करणे हाच होता.

 

दोषसिद्धीचे प्रमाण शून्य

न्यायालयात सायबर क्राईमचे ३० खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालिन दाखल अशा २०५ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही. वर्षाअखेरीस सर्वच २०५ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित होती व दोषसिद्धीचा दर शून्य इतका होता. १०० टक्के प्रकरणे प्रलंबित होती व देशात हा दर सर्वात जास्त होता.

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम