शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यना माणसाच्या आचार, विचार, व्यवहारात बदल घडवून आणते; डॉ. संजय दुधे

By आनंद डेकाटे | Updated: March 16, 2024 15:05 IST

तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतात मनुष्याच्या सुखाचा मार्ग सांगितला आहे. त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकविलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो.

नागपूर : तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतात मनुष्याच्या सुखाचा मार्ग सांगितला आहे. त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकविलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो. त्यांनी सांगितलेली विपश्यना ही मन शुद्ध करणारी विद्या आहे. विपश्यना माणसाच्या आचार, विचार, व्यवहारात बदल घडवून आणते, असे प्रतिपादन प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.

पाली -प्राकृत विभाग, बुद्धिस्ट स्टडीज सेंटर आणि पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय पाली भाषा परिषद पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. दुधे बोलत होते. उद्घाटक भदंत संघरत्न मानके होते. विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. प्रतिभा गेडाम, डॉ. अनोमा साखरे व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटनीय मार्गदर्शनात भदंत संघरत्न मानके यांनी मोठ्या कष्टाने तथागत बुद्धांनी मनुष्याच्या दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला असल्याचे सांगितले. हा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग या रूपाने आम्हास प्राप्त झाला. या मार्गातील समाधी हे अंग विपश्यनेचे क्षेत्र आहे. भारतातून लुप्त झालेली ही विद्या म्यानमार येथे सुरक्षित होती. ही विद्या भारतात प्रचलित करण्याचे महान कार्य आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी केले. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भदंत मानके म्हणाले.

प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी यांनी केले. संचालन, डॉ. रेखा बडोले, डॉ. कल्पना मून, डॉ. बिना नगरारे, प्रा. ममता सुखदेवे, योगिता इंगळे यांनी केले. आभार डॉ. ज्वाला डोहाने यांनी मानले.

अनोमा साखरे यांचा सत्कार

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे डी. लीट. प्रदान करण्यात आलेल्या विभागातील संशोधक, प्राध्यापिका डॉ. अनोमा साखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विभागातील विद्यार्थी अशोक रामटेके यांनी अनुवादित केलेल्या आनंद या ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. दिवसभरातील सत्रांमध्ये डॉ. प्रतिभा गेडाम, डॉ. मालती साखरे, डॉ. सुरजित कुमार सिंह, प्रा. सरोज चौधरी -वाणी,डॉ. तलत प्रवीण, डॉ. मोहन वानखेडे, कल्पना सोमकुवर, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनीही मार्गदशर्न केले.