शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पुनर्वसनाच्या मुद्यावरून गावकरी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या थातूरमातूर कार्यप्रणालीवर हेवती गावकरी चांगलेच संतापले आहेत. दोन दिवसापासून पुनर्वसन आणि समस्या या मुद्यावरून गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे मकरधोकडा क्रमांक ३ (दिनेश खदान) कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ठप्प पडले आहे.

उमरेड तालुक्यातील हेवतीनजीक सन २०१५ पासून मकरधोकडा खाण क्रमांक ३ चे उत्पादन कार्य सुरू झाले. कोळसा खाण ते हेवती या गावाचे अंतर केवळ ४०० मीटर आहे. अंतर फारच कमी असल्याने वेकोलि प्रशासनाने आधी हेवती गावाच्या पुनर्वसनाचा गुंता सोडवावयास हवा होता. आधी खाण सुरू होऊ द्या, पुनर्वसन आणि समस्या सोडवू, अशी गोडीगुलाबीची भाषा वेकोलिने वापरली. उत्पादन सुरू केले. पाच वर्षानंतरही गुंता सोडविण्यात आला नाही. वारंवार निवेदने, चर्चा आणि आंदोलनानंतरही वेकोलि प्रशासन केवळ पोकळ बाता करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे.

उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वेकोलि प्रशासनावर सडकून टीका करीत हेवती गावकऱ्यांनी शनिवारपासून (दि. १२) बेमुदत आंदोलन सुरू करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. जोपर्यंत नवीन नियमावली आणि कायद्यान्वये मोबदला व पुनर्वसन केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुरेखा वाघ, भिका भोयर, राजू येतारी, राहुल हुलके, संजय डांगाले, शिशुपाल शंभरकर, विठ्ठल हुलके, शेषराव हुलके, रवी चिचुलकर, मारोती पिल्लेवान, अर्चना चिचुलकर, भारती पिल्लेवान, सुरेखा पोटे, संध्या पिल्लेवान, अनिल लोखंडे, देवा डांगाले, कैलास हुलके, सुभाष चाफले, किसना राऊत, पुनाराम आदोळे, मनोहर ठाकरे, राकेश ठाकरे, अशोक गुप्ता, प्रकाश गुप्ता, अरुण गुप्ता, गौरव हुलके, गजानन मूल, उपास पाल आदींनी दिला आहे.

....

ब्लास्टिंगचे हादरे

केवळ ४०० मीटर अंतरावर १,२०० लोकवस्तीचे वसलेल्या हेवती गावकऱ्यांना दररोज ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा सामना करावा लागत आहे. ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा, घरांची पडझड सुरू असल्याने अनेक जण जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आणि धुळीमुळे आरोग्यविषयक समस्यांचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे.