शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाच्या मुद्यावरून गावकरी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या थातूरमातूर कार्यप्रणालीवर हेवती गावकरी चांगलेच संतापले आहेत. दोन दिवसापासून पुनर्वसन आणि समस्या या मुद्यावरून गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे मकरधोकडा क्रमांक ३ (दिनेश खदान) कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ठप्प पडले आहे.

उमरेड तालुक्यातील हेवतीनजीक सन २०१५ पासून मकरधोकडा खाण क्रमांक ३ चे उत्पादन कार्य सुरू झाले. कोळसा खाण ते हेवती या गावाचे अंतर केवळ ४०० मीटर आहे. अंतर फारच कमी असल्याने वेकोलि प्रशासनाने आधी हेवती गावाच्या पुनर्वसनाचा गुंता सोडवावयास हवा होता. आधी खाण सुरू होऊ द्या, पुनर्वसन आणि समस्या सोडवू, अशी गोडीगुलाबीची भाषा वेकोलिने वापरली. उत्पादन सुरू केले. पाच वर्षानंतरही गुंता सोडविण्यात आला नाही. वारंवार निवेदने, चर्चा आणि आंदोलनानंतरही वेकोलि प्रशासन केवळ पोकळ बाता करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे.

उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वेकोलि प्रशासनावर सडकून टीका करीत हेवती गावकऱ्यांनी शनिवारपासून (दि. १२) बेमुदत आंदोलन सुरू करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. जोपर्यंत नवीन नियमावली आणि कायद्यान्वये मोबदला व पुनर्वसन केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुरेखा वाघ, भिका भोयर, राजू येतारी, राहुल हुलके, संजय डांगाले, शिशुपाल शंभरकर, विठ्ठल हुलके, शेषराव हुलके, रवी चिचुलकर, मारोती पिल्लेवान, अर्चना चिचुलकर, भारती पिल्लेवान, सुरेखा पोटे, संध्या पिल्लेवान, अनिल लोखंडे, देवा डांगाले, कैलास हुलके, सुभाष चाफले, किसना राऊत, पुनाराम आदोळे, मनोहर ठाकरे, राकेश ठाकरे, अशोक गुप्ता, प्रकाश गुप्ता, अरुण गुप्ता, गौरव हुलके, गजानन मूल, उपास पाल आदींनी दिला आहे.

....

ब्लास्टिंगचे हादरे

केवळ ४०० मीटर अंतरावर १,२०० लोकवस्तीचे वसलेल्या हेवती गावकऱ्यांना दररोज ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा सामना करावा लागत आहे. ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा, घरांची पडझड सुरू असल्याने अनेक जण जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आणि धुळीमुळे आरोग्यविषयक समस्यांचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे.