शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पुनर्वसनाच्या मुद्यावरून गावकरी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या थातूरमातूर कार्यप्रणालीवर हेवती गावकरी चांगलेच संतापले आहेत. दोन दिवसापासून पुनर्वसन आणि समस्या या मुद्यावरून गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे मकरधोकडा क्रमांक ३ (दिनेश खदान) कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ठप्प पडले आहे.

उमरेड तालुक्यातील हेवतीनजीक सन २०१५ पासून मकरधोकडा खाण क्रमांक ३ चे उत्पादन कार्य सुरू झाले. कोळसा खाण ते हेवती या गावाचे अंतर केवळ ४०० मीटर आहे. अंतर फारच कमी असल्याने वेकोलि प्रशासनाने आधी हेवती गावाच्या पुनर्वसनाचा गुंता सोडवावयास हवा होता. आधी खाण सुरू होऊ द्या, पुनर्वसन आणि समस्या सोडवू, अशी गोडीगुलाबीची भाषा वेकोलिने वापरली. उत्पादन सुरू केले. पाच वर्षानंतरही गुंता सोडविण्यात आला नाही. वारंवार निवेदने, चर्चा आणि आंदोलनानंतरही वेकोलि प्रशासन केवळ पोकळ बाता करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे.

उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वेकोलि प्रशासनावर सडकून टीका करीत हेवती गावकऱ्यांनी शनिवारपासून (दि. १२) बेमुदत आंदोलन सुरू करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. जोपर्यंत नवीन नियमावली आणि कायद्यान्वये मोबदला व पुनर्वसन केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुरेखा वाघ, भिका भोयर, राजू येतारी, राहुल हुलके, संजय डांगाले, शिशुपाल शंभरकर, विठ्ठल हुलके, शेषराव हुलके, रवी चिचुलकर, मारोती पिल्लेवान, अर्चना चिचुलकर, भारती पिल्लेवान, सुरेखा पोटे, संध्या पिल्लेवान, अनिल लोखंडे, देवा डांगाले, कैलास हुलके, सुभाष चाफले, किसना राऊत, पुनाराम आदोळे, मनोहर ठाकरे, राकेश ठाकरे, अशोक गुप्ता, प्रकाश गुप्ता, अरुण गुप्ता, गौरव हुलके, गजानन मूल, उपास पाल आदींनी दिला आहे.

....

ब्लास्टिंगचे हादरे

केवळ ४०० मीटर अंतरावर १,२०० लोकवस्तीचे वसलेल्या हेवती गावकऱ्यांना दररोज ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा सामना करावा लागत आहे. ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा, घरांची पडझड सुरू असल्याने अनेक जण जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आणि धुळीमुळे आरोग्यविषयक समस्यांचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे.