शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ग्रामस्थांनी फेटाळला अविश्वास प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेसूर : स्थानिक सरपंच व उपसरपंच याच्या अंतर्गत वादामुळे गावातील विविध विकासकामे रखडली आहेत. त्यातच ग्रामपंचायत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेसूर : स्थानिक सरपंच व उपसरपंच याच्या अंतर्गत वादामुळे गावातील विविध विकासकामे रखडली आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचाविराेधात अविश्वास प्रस्ताव घेत पारित केला. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आयाेजित करून याच अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यात प्रस्तावाच्या बाजूने १४९, तर विराेधात ५११ ग्रामस्थांनी मतदान केल्याने हा प्रस्ताव ३६२ मतांनी फेटाळण्यात आला.

बेसूर (ता. भिवापूर) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तीन वर्षे सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या काळात गावात काेणतीही विकासकामे करण्यात आली नाहीत. याला सरपंच स्नेहा चावट व उपसरपंच भय्याजी गिरडे यांच्यातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे ठरवित उपसरपंच भय्याजी गिरडे यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव घेतला आणि ताे पारितही करण्यात आला. त्यामुळे भय्याजी गिरडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे दाद मागितली.

त्याअनुषंगाने गुरुवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयाेजन करण्यात आले. यात अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात येणार असल्याची सूचनाही मतदारांना आधी देण्यात आली हाेती. तशी व्यवस्थाही प्रशासनाने केली हाेती. गावातील एकूण १,८१५ मतदारांपैकी ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६६० मते वैध, तर ६७ मते अवैध ठरविण्यात आली. वैध मतांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने १४९, तर विराेधात ५११ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव ३६२ मतांनी फेटाळण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी मतमाेजणीनंतर जाहीर केले.

....

उपसरपंचावरील आराेप

हा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी नाकारलेले भय्याजी गिरडे यांचे उपसरपंचपद ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा बहाल केले. अविश्वास ठराव घेताना त्यांच्या विराेधात कामात अथळा निर्माण करणे, ठरावाना विराेध करणे, ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांशी अर्वाच्य भाषेत बाेलणे यासह एकूण २० आराेपांचा ठपका ठेण्यात आला हाेता. या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपणावरून ग्रामस्थांना करण्यात आले हाेते. मात्र, बहुतांश ग्रामस्थांनी ठरावाच्या विराेधात मतदान केले.