शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 08:00 IST

शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले!

ठळक मुद्देगावात सर्वत्र हाहाकार, १३ हेक्टर शेती पाण्याखाली ग्रामस्थांनी जीव वाचविण्यासाठी घेतला टेकडीचा आधार

चंदू बोरकर

नागपूर : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर ग्रामीण तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशातच शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले! गावाशेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तलावाचे पाणी गावात शिरल्याने गावातील लोकांनी जीव वाचविण्यासाठी टेकडीकडे धाव घेतली. मात्र, पुराच्या पाण्याने गावातील १६ घरांतील अन्न-धान्याचे प्रचंड नुकसान झाले. गावातील १३ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली. याशिवाय १८१ पाळीव जनावरे वाहून गेली.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जुनापाणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान बांध फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरले. येथील ग्रामस्थ झोपेत असतानाच गावातील १८१ पाळीव जनावरे वाहून गेली. यामध्ये १८ गाई, ५ बैल, ७१ बकऱ्या, १ वासरू, ८६ कोंबड्यांचा समावेश आहे. तलावाचे पाणी गावातील १६ घरांत शिरले. याशिवाय शिवारातील १३ हेक्टर क्षेत्रातील कापूस आणि तूर पिकाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी जुनापाणी गाठले. ग्रामस्थांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले. गावातील नुकसानीचा अहवाल मंडळ अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अल्का मुळक यांनी तालुका प्रशासनाला सादर केला आहे.

झाेपेत असताना पहाटे तलावाचा बांध फुटल्यामुळे आरडाओरड ऐकू आली. जीव वाचविण्यासाठी आम्ही टेकडीकडे धाव घेतली. तलावाच्या पाण्यात माझ्या पाच बकऱ्या, चार गाई व सहा कोंबड्या वाहून गेल्या.

- रवींद्र हंसराज उईके, ग्रामस्थ

तलावाचे पाणी गावात पहाटे पाच वाजता शिरल्याने पुरात माझे दोन बैल व तीन बकऱ्या वाहून गेल्या. शासनाने तातडीने मदत करावी. आमच्या घरचे धान्यही भिजले आहे.

- पंचफुला वसंता वरकाडे, ग्रामस्थ.

टॅग्स :floodपूर