शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 08:00 IST

शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले!

ठळक मुद्देगावात सर्वत्र हाहाकार, १३ हेक्टर शेती पाण्याखाली ग्रामस्थांनी जीव वाचविण्यासाठी घेतला टेकडीचा आधार

चंदू बोरकर

नागपूर : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर ग्रामीण तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशातच शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले! गावाशेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तलावाचे पाणी गावात शिरल्याने गावातील लोकांनी जीव वाचविण्यासाठी टेकडीकडे धाव घेतली. मात्र, पुराच्या पाण्याने गावातील १६ घरांतील अन्न-धान्याचे प्रचंड नुकसान झाले. गावातील १३ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली. याशिवाय १८१ पाळीव जनावरे वाहून गेली.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जुनापाणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान बांध फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरले. येथील ग्रामस्थ झोपेत असतानाच गावातील १८१ पाळीव जनावरे वाहून गेली. यामध्ये १८ गाई, ५ बैल, ७१ बकऱ्या, १ वासरू, ८६ कोंबड्यांचा समावेश आहे. तलावाचे पाणी गावातील १६ घरांत शिरले. याशिवाय शिवारातील १३ हेक्टर क्षेत्रातील कापूस आणि तूर पिकाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी जुनापाणी गाठले. ग्रामस्थांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले. गावातील नुकसानीचा अहवाल मंडळ अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अल्का मुळक यांनी तालुका प्रशासनाला सादर केला आहे.

झाेपेत असताना पहाटे तलावाचा बांध फुटल्यामुळे आरडाओरड ऐकू आली. जीव वाचविण्यासाठी आम्ही टेकडीकडे धाव घेतली. तलावाच्या पाण्यात माझ्या पाच बकऱ्या, चार गाई व सहा कोंबड्या वाहून गेल्या.

- रवींद्र हंसराज उईके, ग्रामस्थ

तलावाचे पाणी गावात पहाटे पाच वाजता शिरल्याने पुरात माझे दोन बैल व तीन बकऱ्या वाहून गेल्या. शासनाने तातडीने मदत करावी. आमच्या घरचे धान्यही भिजले आहे.

- पंचफुला वसंता वरकाडे, ग्रामस्थ.

टॅग्स :floodपूर