शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

गटबाजीत अडकला गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:37 IST

नरखेड : नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह आठ सदस्य आहेत. परंतु यामध्ये चार-चारचे दोन गट पडले आहेत. सरपंचासह चार ...

नरखेड : नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह आठ सदस्य आहेत. परंतु यामध्ये चार-चारचे दोन गट पडले आहेत. सरपंचासह चार सदस्य एकीकडे तर उपसरपंचासह चार सदस्य दुसरीकडे आहेत. सरपंचांनी केलेल्या खर्चावर उपसरपंच सही करीत नाही. उपसरपंच यांनी सुचविलेल्या कामांना सरपंच संमती देत नाही. त्यामुळे नाराज झालेल्या उपसरपंचांनी सरपंचाविरुद्ध गावातील विकास ठप्प असून निधी परत गेल्याची तक्रार पं.स. खंडविकास अधिकाऱ्यांकडे करीत २७ डिसेंबरपासून ग्रा.पं.ची मासिक सभा व कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या या धोरणामुळे गावाचे मात्र नुकसान होत आहे. उपसरपंच मारोती हिरामण लांडगे यांनी पं.स.चे खंडविकास अधिकारी यांंच्याकडे तक्रार दाखल करून सरपंच दर महिन्याला मासिक सभा घेऊन विचारलेल्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत नाही. ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सभेचे आयोजन करणे बंधनकारक असताना, कधीही महिला सभा घेतली नाही. घेतलेल्या एकाही प्रस्ताव, ठरावावर अंमलबजावणी करीत नाही. सभेव्यतिरिक्त कधीच ग्रामपंचायत कार्यालयात येत नाही. येथील ग्रामपंचायत कार्यकारिणी २० जुलै २०१९ पासून कार्यरत आहे. पण ग्रा.पं. अधिनियम ४९(९)नुसार ग्राम समित्या गठित करण्यात आल्या नाही. महिला व बालकल्याणचा १० टक्के खर्च केला नाही. १५ टक्के मागासवर्गीय खर्च केला नाही. चौदाव्या वित्त आयोग आराखड्यानुसार कामे झालेली नाही. सरपंच वंदना मधुकर टेकाम असताना त्यांचे पतीच कामकाजात ढवळाढवळ करतात, असे विविध आरोप करण्यात आले होते. खंडविकास अधिकाऱ्यांनी उपसरपंचांनी केलेल्या आरोपाची चौकशी करून जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. पण पुढे काहीएक झाले नाही.

- उपसरपंच मारोती हिरामण लांडगे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ काय कारवाई करतात, यावर सर्व अवलंबून आहे.

- प्रशांत मोहोड, खंडविकास अधिकारी, पं.स. नरखेड.

मला गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडून दिले आहे. गावातील विकासात्मक कामे नियमानुसार सुरू आहेत. त्यात गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य अडवणुकीचे धोरण स्वीकारून विकास कामात अडथळा निर्माण करीत असेल तर त्यांना गावकऱ्यांनीच समज देणे गरजेचे आहे.

-वंदना टेकाम

सरपंच, सिंगारखेडा.