शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सतर्कतेने वाचला महिला-मुलींसह सहाजणांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

नागपूर : दारुड्या पतीपासून त्रस्त होऊन मुलींसह आत्महत्येसाठी आलेल्या पत्नीसह सहाजणांना बुधवारी गांधीसागर तलावात आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. ...

नागपूर : दारुड्या पतीपासून त्रस्त होऊन मुलींसह आत्महत्येसाठी आलेल्या पत्नीसह सहाजणांना बुधवारी गांधीसागर तलावात आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. पानबुडे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहाही जणांचा जीव वाचला.

खरबी निवासी ३२ वर्षीय विवाहिता मजुरी करते. पतीही मजूर आहे. दारूच्या व्यसनाने पती पत्नीला सतत त्रास देतो. तीन महिन्यांपूर्वी विवाहिता मुलींसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गांधीसागर तलावावर आली होती. बुधवारीही दुपारी ३.३० वाजता दोन-दोन वर्षांच्या जुळ्या मुली आणि सात वर्षांच्या मुलीसह गांधीसागर तलावावर आली. ती गणेशमूर्ती विसर्जन घाटावर बसली होती. पानबुडा जगदीश खरे याचे विवाहितेवर लक्ष गेले. जगदीशने याची सूचना तत्काळ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विवाहिता आणि मुलींना ठाण्यात आणले. महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विवाहितेला मार्गदर्शन करून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. महिलेला मदतीचे आश्वासन देत पतीसह घरी रवाना करण्यात आले. विवाहिता आणि तिच्या मुलींचा जीव वाचविल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी गांधीसागर तलावाची निगरानी वाढविली आहे.

दुसऱ्या घटनेत सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि रिकव्हरी एजंटचे काम करणारा युवक संदिग्ध अवस्थेत तलावाच्या काठावर दिसून आले. चौकशी केल्यानंतर शिक्षकाने पत्नीशी विवाद झाल्याने, तर रिकव्हरी एजंटने अन्य कारणांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. दोघांनाही गणेशपेठ ठाण्यात आणून मार्गदर्शन करण्यात आले. तीन तासांत सहा लोक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गांधीसागर तलावाजवळ आल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. यापूर्वीही गणेशपेठ पोलिसांनी तीन लोकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले होते. गांधीसागर तलाव आत्महत्या करण्यासाठी बदनाम आहे. आतापर्यंत वाचविण्यात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी सांगितले.