शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

विदर्भातील ‘रेड अलर्ट’ची हवा निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:26 IST

हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे.

ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाज पुन्हा चुकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरण्याचे प्रकार प्रत्येक मोसमात पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही योग्य अंदाज वर्तविण्यात विभाग अपयशी ठरत आहे.गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा हवामान विभागातर्फे जारी करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही संबंधित अलर्टच्या आधारावर सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.मनपाला ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. परंतु आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे हवामान विभागाचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. रविवारी डेली वेदर रिपोर्टच्या कॉलममध्ये रेड अलर्टसोबतच आॅरेंज अलर्टचा इशाराही हटवण्यात आलेला आहे. केवळ ‘हीट वेव्ह’ उष्णतेची लाटचा इशारा दिला जात आहे. नागपूरमध्ये असा अंदाज वर्तविला जात आहे की, येणाऱ्या तीन दिवसात तापमान ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. परंतु नागपुरात कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्री दरम्यान सुरु आहे. रविवारी कमाल (जास्तीत जास्त) तापमान ४४.१ डिग्री सेल्सिअस होते तर रात्रीचे तापमान गेल्या २४ तासात ४.७ डिग्री सेल्सिअस खाली येऊन २८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले आहे.चंद्रपूर राहिले सर्वात उष्णमागील काही दिवसात विदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वात जास्त उष्ण राहिला, रविवारीसुद्धा विदर्भात चंद्रपूर जिल्हाच सर्वात जास्त उष्ण राहिला. येथे कमाल तपामान ४५.६ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे ४५.५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. वर्धा ४४.५, अकोला ४३.८, अमरावती ४३.६, गडचिरोली ४३.४, गोंदियामध्ये ४३, वाशिम-यवतमाळमध्ये ४२.८, बुलडाणामध्ये ४०.७ डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री सेल्सिअसने जास्त आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल