शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

भाजपच्या स्वबळाच्या निर्णयाने विदर्भाच्या मागणीला आले बळ

By admin | Updated: October 1, 2014 00:52 IST

विदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे.

सेनेला बसणार धक्का : स्वतंत्र राज्य निर्माण होईल अशी विदर्भवाद्यांना आशाअभिनय खोपडे -गडचिरोलीविदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. या सर्व स्वबळाच्या गडबडीत विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मात्र वैदर्भीय मतदाराच्या रोषाचा सामना करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तत्कालीन केंद्र सरकारने तेलंगणा राज्य निर्माण केल्यानंतर विदर्भ राज्याच्या चळवळीनेही चांगला जोर पकडला. राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत आजवर स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन छेडण्यात येत होते व या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भवादी नंतर निवडणुकांमध्ये उतरत होते. विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांना वैदर्भीय मतदारांना कधीही दाद दिल्याचे दिसले नाही. उलट विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. मात्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर गैर राजकीय संघटनांनी विदर्भ राज्याबाबत जोरदार जनजागृती संपूर्ण विदर्भात केली. त्यामुळे लोकांना विदर्भामध्ये किती ताकद आहे, छोटे राज्य कसे सक्षम होऊ शकते याची जाणीव झाली आहे. सध्याच्या महाराष्ट्र राज्यात राहून आपल्यावर कसा अन्याय झाला. याचीही जाण वैदर्भीय जनतेला झालेली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने पूर्वीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला आहे. परंतु आजवर शिवसेनेचे लोडणे त्यांच्या गळ्याला असल्याने विदर्भ राज्याबाबत भाजप फारशी स्पष्ट भूमिका घेऊ शकलेला नव्हता. आता मात्र भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यात जर भाजपला यश मिळाले तर विदर्भ राज्य वेगळे होण्यास कोणतीही अडचण राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भ राज्याला विरोधच केला आहे. गडचिरोलीत स्वत: अजित पवार यांनी विदर्भ राज्याला जनसमर्थन नसल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस पक्षाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या ५६ हुतात्म्यांच्या स्मरणात मशाली जाळून विदर्भ राज्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करून टाकली आहे. तसेच दुसरीकडे भाजपने विदर्भ राज्याच्या चळवळीचे पूर्वीपासून नेतृत्व करणाऱ्या श्रीमंत राजे दिवंगत विश्वेश्वरराव महाराज यांच्या नाविससोबत अहेरी विधानसभा क्षेत्रात आघाडी केली आहे. त्यामुळे विदर्भवाद्यांना घेऊन चालण्याची भाजपची चाल स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळकटी देणारी ठरत आहे.