शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

भाजपच्या स्वबळाच्या निर्णयाने विदर्भाच्या मागणीला आले बळ

By admin | Updated: October 1, 2014 00:52 IST

विदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे.

सेनेला बसणार धक्का : स्वतंत्र राज्य निर्माण होईल अशी विदर्भवाद्यांना आशाअभिनय खोपडे -गडचिरोलीविदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. या सर्व स्वबळाच्या गडबडीत विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मात्र वैदर्भीय मतदाराच्या रोषाचा सामना करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तत्कालीन केंद्र सरकारने तेलंगणा राज्य निर्माण केल्यानंतर विदर्भ राज्याच्या चळवळीनेही चांगला जोर पकडला. राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत आजवर स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन छेडण्यात येत होते व या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भवादी नंतर निवडणुकांमध्ये उतरत होते. विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांना वैदर्भीय मतदारांना कधीही दाद दिल्याचे दिसले नाही. उलट विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. मात्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर गैर राजकीय संघटनांनी विदर्भ राज्याबाबत जोरदार जनजागृती संपूर्ण विदर्भात केली. त्यामुळे लोकांना विदर्भामध्ये किती ताकद आहे, छोटे राज्य कसे सक्षम होऊ शकते याची जाणीव झाली आहे. सध्याच्या महाराष्ट्र राज्यात राहून आपल्यावर कसा अन्याय झाला. याचीही जाण वैदर्भीय जनतेला झालेली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने पूर्वीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला आहे. परंतु आजवर शिवसेनेचे लोडणे त्यांच्या गळ्याला असल्याने विदर्भ राज्याबाबत भाजप फारशी स्पष्ट भूमिका घेऊ शकलेला नव्हता. आता मात्र भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यात जर भाजपला यश मिळाले तर विदर्भ राज्य वेगळे होण्यास कोणतीही अडचण राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भ राज्याला विरोधच केला आहे. गडचिरोलीत स्वत: अजित पवार यांनी विदर्भ राज्याला जनसमर्थन नसल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस पक्षाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या ५६ हुतात्म्यांच्या स्मरणात मशाली जाळून विदर्भ राज्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करून टाकली आहे. तसेच दुसरीकडे भाजपने विदर्भ राज्याच्या चळवळीचे पूर्वीपासून नेतृत्व करणाऱ्या श्रीमंत राजे दिवंगत विश्वेश्वरराव महाराज यांच्या नाविससोबत अहेरी विधानसभा क्षेत्रात आघाडी केली आहे. त्यामुळे विदर्भवाद्यांना घेऊन चालण्याची भाजपची चाल स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळकटी देणारी ठरत आहे.