शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विदर्भ साहित्य संमेलन; शोषण आहे तोपर्यंत मार्क्सवाद संपणार नाही; डॉ. वि. स.जोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:30 IST

Nagpur News शोषण आहे तोपर्यंत प्रतिकारासाठी मार्क्सवाद राहणारच आहे, तो संपणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स.जोग यांनी प्रकट मुलाखतीत केले.

 

नागपूर : कम्युनिस्ट पक्ष संपला असे समजू नका. तो पुन्हा नव्याने प्रस्थापित होऊ शकतो. कारण शोषण आहे तोपर्यंत प्रतिकारासाठी मार्क्सवाद राहणारच आहे, तो संपणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स.जोग यांनी प्रकट मुलाखतीत केले.

विदर्भ साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी साहित्यिक डॉ. वि. स.जोग यांची प्रकट मुलाखत डॉ.अजय कुलकर्णी व स्नेहल शिंदे यांनी घेतली. याप्रसंगी डॉ. जोग यांच्या प्रसिद्ध मकरंद मुमताज या साहित्यकृतीवर विविध प्रश्न विचारून डॉ. जोग यांना बोलते केले. राजकारण ते समाजकारण यांचा साहित्य क्षेत्रातील प्रभावावरही प्रश्न विचारला. साहित्यिक राजकारणापासून दूर राहू शकत नाही. आपण स्वतः कम्युनिस्ट विचारसरणी मानतो, असे डॉ. जोग यांनी स्पष्ट केले.

नितीन गडकरी व भाई बर्धन ही दोन्ही मंडळी वेगळ्या विचारसरणीची आहेत. असे असले तरी दोघांची विचारसरणी मला पटणारी असल्यामुळे आपण केलेली मांडणी विसंगत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यावर गडकरी भाई वर्धन यांची भेट घेण्यासाठी गेले होते असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

आत्मकथेतूनच आत्मविकासाचा मार्ग जातो. मात्र साहित्यिकांकडून महापुरुषाचे वस्तुनिष्ठ मापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दलित साहित्यात पूर्वी आक्रमकता व आक्रोश होता. आता मात्र तो दिसत नसल्याचे मत त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर व मार्क्स यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

कोणत्याही संघटनेत नव्या व जुन्या लोकांची सरमिसळ असली पाहिजे. नव्यांनी जुन्यांना मनोहर जोशी करू नये, अशी टिप्पणी त्यांनी केली. आपल्याला मिळालेला सोव्हिएत युनियनचा पुरस्कार हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाचे अध:पतन झाले असल्याची खंतही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दरम्यान व्यक्त केली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन