शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना सबसिडीचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 10:48 IST

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्दे१२०० कोटी संपले महावितरणला हवे ३०० कोटी

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले. वर्ष २०१९-२० मध्ये उद्योगांना दिलासा देण्यासाठी १२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम आता संपली आहे. महावितरणने दिलासा कायम ठेवण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून हा निधी न मिळाल्यास विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना तगडा झटका लागण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने विदर्भ-मराठवाडा या दोन्ही विभागांतील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज बिलात दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकार महावितरणला सबसिडी देत आहे. ३१ मार्च रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. परंतु हा फेब्रुवारी महिन्यातच संपला. अशा परिस्थितीत महावितरणने मार्चमध्ये जारी होणाऱ्या वीज बिलात दिलासा देण्यासाठी ३०० कोटी रुपयाची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत पैसे जारी केलेले नाही. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना बसत आहे. विदर्भात ३०२४ उद्योगांकडे एचटी कनेक्शन आहे. मराठवाड्यात ही संख्या २१०४ आहे. याशिवाय एल.टी. लाईनवरूनही अनेक उद्योगांना सबसिडी मिळते. परंतु उद्योगांना दिलासा देण्यासोबतच वीज बिलसुद्धा अडकले आहेत. दर महिन्याच्या चार तारखेपूर्वी बिल मिळणारे उद्योग अजूनही याची प्रतीक्षा करीत आहेत.

अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने वाढली चिंताराज्य सरकार विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अर्थसंकल्पीय तरतूद करीत आहे. २०१९-२० मध्येही १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु वर्ष २०२०-२१ साठी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर मार्चमधील वीज बिलसुद्धा जारी झालेले नाहीत. यामुळे उद्योजक चिंतेत पडले आहेत. असे असले तरी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा कायम राहण्याची घोषणा केलेली आहे.

सोमवारपासून होणार बिल वाटप - महावितरणयासंदर्भात महावितरणचे म्हणणे आहे की, राज्य सरकारकडून निधी मिळाल्यावरच ते उद्योगांना दिलासा देऊ शकतात. मार्चमध्ये सबसिडी देण्यासाठी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत निधी मिळाल्यास बिल वाटपाची प्रक्रिया सुरु केली जाईल.

उद्योगांना प्रोत्साहन मिळत राहायला हवे - व्हीआयएविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष आर.बी. गोयंका यांनी सांगितले की, विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा कायम ठेवायला हवा. या भरवशावरच उद्योगांना विशेषत: टेक्स्टाईल उद्योगांना विस्तार करण्याची योजना आखली आहे. सबसिडी बंद होताच यालाही फटका बसेल.

टॅग्स :electricityवीज