शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना सबसिडीचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 10:48 IST

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्दे१२०० कोटी संपले महावितरणला हवे ३०० कोटी

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले. वर्ष २०१९-२० मध्ये उद्योगांना दिलासा देण्यासाठी १२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम आता संपली आहे. महावितरणने दिलासा कायम ठेवण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून हा निधी न मिळाल्यास विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना तगडा झटका लागण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने विदर्भ-मराठवाडा या दोन्ही विभागांतील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज बिलात दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकार महावितरणला सबसिडी देत आहे. ३१ मार्च रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. परंतु हा फेब्रुवारी महिन्यातच संपला. अशा परिस्थितीत महावितरणने मार्चमध्ये जारी होणाऱ्या वीज बिलात दिलासा देण्यासाठी ३०० कोटी रुपयाची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत पैसे जारी केलेले नाही. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना बसत आहे. विदर्भात ३०२४ उद्योगांकडे एचटी कनेक्शन आहे. मराठवाड्यात ही संख्या २१०४ आहे. याशिवाय एल.टी. लाईनवरूनही अनेक उद्योगांना सबसिडी मिळते. परंतु उद्योगांना दिलासा देण्यासोबतच वीज बिलसुद्धा अडकले आहेत. दर महिन्याच्या चार तारखेपूर्वी बिल मिळणारे उद्योग अजूनही याची प्रतीक्षा करीत आहेत.

अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने वाढली चिंताराज्य सरकार विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अर्थसंकल्पीय तरतूद करीत आहे. २०१९-२० मध्येही १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु वर्ष २०२०-२१ साठी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर मार्चमधील वीज बिलसुद्धा जारी झालेले नाहीत. यामुळे उद्योजक चिंतेत पडले आहेत. असे असले तरी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा कायम राहण्याची घोषणा केलेली आहे.

सोमवारपासून होणार बिल वाटप - महावितरणयासंदर्भात महावितरणचे म्हणणे आहे की, राज्य सरकारकडून निधी मिळाल्यावरच ते उद्योगांना दिलासा देऊ शकतात. मार्चमध्ये सबसिडी देण्यासाठी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत निधी मिळाल्यास बिल वाटपाची प्रक्रिया सुरु केली जाईल.

उद्योगांना प्रोत्साहन मिळत राहायला हवे - व्हीआयएविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष आर.बी. गोयंका यांनी सांगितले की, विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा कायम ठेवायला हवा. या भरवशावरच उद्योगांना विशेषत: टेक्स्टाईल उद्योगांना विस्तार करण्याची योजना आखली आहे. सबसिडी बंद होताच यालाही फटका बसेल.

टॅग्स :electricityवीज