शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

विदर्भ, मेल, दुरांतो रद्द, तीन रेल्वेगाड्या वळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे ...

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे टिटवाळा-कसारा रेल्वे सेक्शनमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम नागपूरच्या रेल्वेगाड्यांवरही पडला. विशेष म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबईवरून गुरुवारी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी या गाड्या नागपुरात येणार नाहीत. नागपूरवरून गुरुवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई मेल नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गाने रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी नागपूरवरून रवाना झालेली नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस भुसावळपर्यंत चालविण्यात आली तर गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावपर्यंत चालविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. या तीन्ही गाड्यांपैकी दुरांतो एक्स्प्रेस आणि विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन नागपुरात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून नागपूरसाठी रवाना करण्यात आली.

.............

वळविलेल्या मार्गाने धावल्या रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा स्पेशल ही गाडी वळविलेल्या वसई रोड, नंदुरबार, जळगाव या मार्गाने चालविली. तर पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशलला वळविलेल्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड या मार्गाने चालविण्यात आले. त्यामुळे या गाड्या विलंबाने धावल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेस्थानकावर हेल्पलाईन बूथ, बसेसची व्यवस्था

मुसळधार पावसामुळे वळविलेल्या मार्गाने आणि शॉर्ट टर्मिनेट झालेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर पॅसेंजर हेल्पलाईन बूथ सुरु करण्यात आले. याशिवाय गैरसोय झालेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुंबई रेल्वे प्रशासनाने २९ बसेसमधून १२९० प्रवाशांना कसारावरून कल्याणला रवाना केले तर ४४ बसेसच्या माध्यमातून २८६० प्रवाशांना इगतपुरीवरून कल्याणला आणण्यात आले. भुसावळ आणि चाळीसगावमध्ये शॉर्ट टर्मिनेट झालेल्या दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या ५३० प्रवाशांना परत नागपूरला पाठविण्यात आले.

३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट, ४८ रद्द

मध्य रेल्वे झोनने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे तसेच रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे महाराष्ट्रातील ३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट कराव्या लागल्या तर ५१ रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट, ४८ रेल्वेगाड्या रद्द आणि १४ रेल्वेगाड्या शॉर्ट ओरिजनेट करण्यात आल्या.

............

मुसळधार पावसामुळे प्रवास केला रद्द

‘मुंबईला महत्वाच्या कामासाठी जात होतो. जाताना नागपूर-मुंबई दुरांतोचे आणि येताना मुंबई-नागपूर दुरांतोचे कन्फर्म तिकीट होते. परंतु मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अडकुन पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.’

-निखील बोंडे, प्रवासी

...........