शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

विदर्भ, मेल, दुरांतो रद्द, तीन रेल्वेगाड्या वळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे ...

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे टिटवाळा-कसारा रेल्वे सेक्शनमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम नागपूरच्या रेल्वेगाड्यांवरही पडला. विशेष म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबईवरून गुरुवारी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी या गाड्या नागपुरात येणार नाहीत. नागपूरवरून गुरुवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई मेल नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गाने रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी नागपूरवरून रवाना झालेली नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस भुसावळपर्यंत चालविण्यात आली तर गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावपर्यंत चालविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. या तीन्ही गाड्यांपैकी दुरांतो एक्स्प्रेस आणि विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन नागपुरात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून नागपूरसाठी रवाना करण्यात आली.

.............

वळविलेल्या मार्गाने धावल्या रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा स्पेशल ही गाडी वळविलेल्या वसई रोड, नंदुरबार, जळगाव या मार्गाने चालविली. तर पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशलला वळविलेल्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड या मार्गाने चालविण्यात आले. त्यामुळे या गाड्या विलंबाने धावल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेस्थानकावर हेल्पलाईन बूथ, बसेसची व्यवस्था

मुसळधार पावसामुळे वळविलेल्या मार्गाने आणि शॉर्ट टर्मिनेट झालेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर पॅसेंजर हेल्पलाईन बूथ सुरु करण्यात आले. याशिवाय गैरसोय झालेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुंबई रेल्वे प्रशासनाने २९ बसेसमधून १२९० प्रवाशांना कसारावरून कल्याणला रवाना केले तर ४४ बसेसच्या माध्यमातून २८६० प्रवाशांना इगतपुरीवरून कल्याणला आणण्यात आले. भुसावळ आणि चाळीसगावमध्ये शॉर्ट टर्मिनेट झालेल्या दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या ५३० प्रवाशांना परत नागपूरला पाठविण्यात आले.

३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट, ४८ रद्द

मध्य रेल्वे झोनने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे तसेच रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे महाराष्ट्रातील ३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट कराव्या लागल्या तर ५१ रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट, ४८ रेल्वेगाड्या रद्द आणि १४ रेल्वेगाड्या शॉर्ट ओरिजनेट करण्यात आल्या.

............

मुसळधार पावसामुळे प्रवास केला रद्द

‘मुंबईला महत्वाच्या कामासाठी जात होतो. जाताना नागपूर-मुंबई दुरांतोचे आणि येताना मुंबई-नागपूर दुरांतोचे कन्फर्म तिकीट होते. परंतु मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अडकुन पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.’

-निखील बोंडे, प्रवासी

...........