शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विदर्भातील सिंचन घोटाळ्यात पाच दोषारोपपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 03:08 IST

सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र; दोन प्रकरणांतील सरकारी कर्मचारी दोषमुक्त

नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत केवळ पाच प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यातही दोन प्रकरणांतील आरोपी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी विशेष सत्र न्यायालयातून दोषमुक्त झाले आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात न आल्याने त्याचा लाभ त्यांना मिळाला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उपरोक्त प्रतिज्ञापत्रात सादर केले. पाचही प्रकरणे नागपूर विभागातील आहेत. राज्य सरकारने विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, दोषमुक्त सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी सक्षम प्राधिकाºयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर नव्याने दोषारोपपत्र सादर होईल.

नागपूर विभागातील ११ प्रकरणामध्ये तपास पूर्ण झाला आहे. सात प्रकरणांत चौकशी पूर्ण झाली आहे व कारवाईसाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. चौकशीत काहीच दखलपात्र न आढळल्याने सात प्रकरणे बंद करण्यात आली. एक प्रकरण बंद करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. पाच प्रकरणांची चौकशी सुरू आहे. आणखी २५० वर निविदांची चौकशी केली जाणार आहे.अमरावती विभागातील २४ प्रकल्पांची खुली चौकशी सुरू असून त्यातील एक हजार दोन निविदांची पडताळणी केली जात आहे. ४ प्रकल्पांतील १४ निविदांची खुली चौकशी करून कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालय