शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम!

By admin | Updated: August 10, 2014 20:55 IST

वेळ निघून गेल्यावर मिळाली सुधारित मान्यता

अकोला: सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या अभावी, सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने, सिंचनाचा मोठा अनुशेष असलेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडल्याची बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच, शासनाच्या जलसंपदा विभागाने काही प्रकल्पांच्या कामांना नुकतीच सुधारित मान्यता दिली. मान्यता मिळण्यास विलंब झाल्यामुळे कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य दिसत नाही आणि परिणामी जलसंपदा विभागाच्या विदर्भातील अधिकार्‍यांपुढे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पश्‍चिम विदर्भाचा विचार केल्यास, सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने, २ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचन अनुशेष कायम आहे. आर्थिक अनुशेष संपला व केवळ भौतिक अनुशेष शिल्लक आहे, असे शासनातर्फे सांगितल्या जात असले तरी, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव या बड्या प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी व उमा या बॅरेजेसची कामे अर्धवटच आहेत. काटीपाटी, कंचनपूर प्रकल्प बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत, तर अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार, पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्पांचा अनुशेष कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे; परंतु विदर्भातील सिंचन प्रकल्पांना साधी प्रशासकीय मान्यताही मिळाली नव्हती. आता कुठे वाई संग्राहक व पोपटखेडा-२ या दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष परिगणित करण्यासाठी १९९४ मध्ये निर्देशांक व अनुशेष समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालानुसार, जून १९९४ अखेर विदर्भाचा एकूण भौतिक अनुशेष ७.८४७ लक्ष हेक्टर (५६.७४ टक्के), तर आर्थिक अनुशेष ४,२६५ कोटी रुपये एवढा होता. निर्देशांक व अनुशेष समितीने प्रति हेक्टरी ५0,000 रुपये या खर्च मानकानुसार हा अनुशेष निर्धारित केला होता. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील जून १९९४ अखेरचा भौतिक अनुशेष ३.४९४ लक्ष हेक्टर व आर्थिक अनुशेष २,४७८ कोटी रुपये एवढा होता. तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेल्या, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी निधीची पूर्तता वेळेवर होत नसल्याने, प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचाही अनुशेष कार्यक्रमात समावेश आहे. जून १९९४ व जून २00७ अखेर अमरावती विभागातील सिंचनाचा भौतिक अनुशेष ३.४९४ लक्ष हेक्टर रब्बी समतुल्य होता. आर्थिक वर्ष २0१0-११ मधील अनुशेषाचे आकडे बघितल्यास, अमरावती विभागाचा २ लाख ४७ हजार हेक्टर अनुशेष कायम आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा भौतिक अनुशेष ८२ हजार हेक्टर, अकोल्याचा ९६ हजार हेक्टर व बुलडाण्याचा ६९ हजार हेक्टर एवढा आहे. याचाच अर्थ १९९४ ते २0११ या १७ वर्षांच्या कालावधीत केवळ ५0,४९४ हेक्टर क्षेत्राचा अनुशेष निकाली निघाला. राज्याच्या उर्वरित प्रदेशांच्या तुलनेत ही गती कासवापेक्षाही कमी आहे. त्याचा परिणाम एकूणच वर्‍हाडातील शेती, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर होत आहे.